शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

दप्तर दिरंगाईने ४० गावांवर पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 9:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार, ही बाब माहिती असताना देखील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत सुरू केली नाही. परिणामी ४० गावातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.शासनाच्या मुख्यमंत्री ...

ठळक मुद्देवर्षभरापासून योजना कागदावर : जि.प.ग्रामीण पुरवठा विभागाचा प्रताप, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार, ही बाब माहिती असताना देखील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत सुरू केली नाही. परिणामी ४० गावातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी मागील वर्षी ४० पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली होती. या योजनेची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन योजना मार्गी लावल्या असत्या तर गावकऱ्यांवरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले असते. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या दप्तर दिंरगाईमुळे ४० पाणी पुरवठा योजना वाद्यांत आल्या आहेत. सध्या या योजना न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याची माहिती आहे. यावर पुढील सुनावणी ७ जुलै ला होणार असल्याने या योजनेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या विचारात घेता या योजनांचा मार्ग मोकळा करण्याची विनंती जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.मुख्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांना केली असल्याचे सांगितले. वर्षभरापूर्वी शासनाने टप्याटप्याने जिल्ह्यातील ४० योजनांना मंजूरी दिली. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन या योजनांची कामे मार्गी लावण्याचे आदेश जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले होते. मात्र पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता शेगावकर यांनी निविदा प्रक्रियेला हातच लावला नाही. पावसाळ्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. यासाठी जि.प.च्या जुलै व आॅगस्ट महिन्याच्या स्थायी समिती सभेत विषय ठेवला होता. तेव्हा शेगावकर यांनी निविदा प्रक्रिया सुरु केली. पण, नियमात तरतूद नसताना काही कंत्राटदारांना लाभ पोहचविण्याच्या उद्देशाने सदर निविदा गठ्ठा पध्दतीने काढल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पाणी पुरवठा विभागाने प्रधान सचिवांना १४ जून २०१७ ला स्वत:च्या स्वाक्षरीने पत्र पाठवून विचारणा केली. तेव्हा प्रधान सचिव यांनी निविदा प्रक्रिया करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सक्षम आहेत असे कळविले. नियमबाह्य अटी टाकून अडचण निर्माण केली जात असल्याची बाब पुढे आली. ४ सप्टेंबरला शेगावकर यांची लेखी तक्रार केली. प्रकरण अंगावर येत असल्याचे पाहुन शेगावकर १० सप्टेंबरला रजेवर गेल्याचा आरोप केला आहे. लघू पाटबंधारे विभागाने कार्यकारी अभियंता विश्वकर्मा यांचेकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्रभार सोपविला. तेव्हा नोव्हेंबरमध्ये परत ४० ही योजनेच्या वेगवेगळ्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या.डिसेंबरमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे निश्चित झाले. पण, काही कंत्राटदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचीका दाखल करुन त्यावर स्थगनादेश मिळविला. या प्रकरणात सुनावणी दरम्यान दोन्ही तारखांना जि.प.तर्फे कुणी उपस्थित नव्हते. त्यामुळे न्यायालयाने ७ जुलै ही तारीख दिल्याची माहिती आहे.गरज उन्हाळ्यात कामे पावसाळ्यातपाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेवर ७ जुलैला निर्णय होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच या योजनेची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा जिल्ह्यातील बऱ्याच भागात पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे या पाणी पुरवठा योजनांची खरी गरज आता आहे. पावसाळ्यात या योजनेची कामे झाल्यास ती नागरिकांच्या उपयोगाची पडणार नसल्याचे गावकºयांचे म्हणने आहे.लवकर तोडगा काढासडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा, कोहळीटोला, डोंगरगाव, खजरी, वडेगाव या येथील पाच पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तर सध्या या भागातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ही अडचण लक्षात घेवून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.