शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

शेतजमिनीच्या मोबदल्यात वेगवेगळे निकष?

By admin | Updated: February 9, 2017 01:10 IST

कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी वितरण करण्यासाठी निघालेला कालवा गणखैरा व तुमखेडा शेत जमिनीतून जात आहे.

मुख्यमंत्र्याकडे तक्रार : गणखैरा व तुमखेडा येथील कालवा प्रकरण गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी वितरण करण्यासाठी निघालेला कालवा गणखैरा व तुमखेडा शेत जमिनीतून जात आहे. यासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात शासनाने वेगवेगळे निकष लावले आहे. त्यामुळे २००६ ते २००७ या कालावधीत भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला एकरी ३ लाख रुपये तर २०१५ या कालावधीत संपादीत झालेल्या जमीन मोबदला ८ लाख रुपये देण्यात आला. यासंदर्भात शासनाची एवढी मोठी तफावत कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या २००६ ते २००७ या काळात ज्या जमिनी शासनाने संपादीत केल्या होत्या. त्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना सरसकट देण्यात आला. मात्र २०१५ ते २०१६ या वर्षात देण्यात आलेल्या मोबदल्यात बाजारमूल्य, अधिसूचना गुणकानुसार, असेन्टचा मोबदला, दिलासा रक्कम १०० टक्के, २५ टक्के सरळ खरेदी संमतीचे अनुदान इत्यादी बाबीचा विचार करीत मोबदला देण्यात आला. गणखैरा ते मिलटोली मार्गाच्या डाव्या हातावरच्या शेतकऱ्यांना नवीन मुल्यांकनानुसार मोबदला उजव्या बाजूच्या शेतकऱ्यांना मात्र जुन्या मुल्यांकनानुसार मोबदला देण्यात आला. ही तफावतच शेतकऱ्यांच्या पचनी पडत नाही. आम्हाला शासनाच्या नव्या धोरणानुसार वाढीव रक्कम का देण्यात येवू नये असा सवाल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. भूमी अधिग्रहण कायदा १९८४ नुसार शेतकऱ्यांना वर्तमान किमतीच्या आधारे ग्रामीण भागाला किमतीेच्या चार पट ऐवढा मोबदला शासनाने द्यायला हवा. पण शासनाने तसे केले नाही. (तालुका प्रतिनिधी)