शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

शिकले, पण संघटित झाले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:43 IST

यंदा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली.

विजय मानकर यंदा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. १४ एप्रिल हा जयंतीचा दिवस असला तरी पाच दिवस आधीपासून आणि नंतरच्या पाच दिवसापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. तालुक्यात आमगाव खुर्द (सालेकसा) येथे तालुकास्तरीय चार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते. शेवटच्या दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले येऊन गेले व समाजाला प्रेरणादायी व हृदयस्पर्शी अशा संबोधन करुन गेले. एकाअर्थी सालेकसा येथील यंदाचे आयोजन हे ऐतिहासिक ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.जयंती उत्सवाच्या या १० दिवसांदरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,’ हा संदेश तालुक्यात एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी पोहोचलाच नसल्याचे दिसून आले. बाबासाहेबांनी दिलेला मंत्र कोण्या एका समाजासाठी मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी, नव्हे तर जगासाठी सार्थक ठरणारा मंत्र आहे. परंतु आज त्या मंत्राचा विसर पडलेले लोक डॉ.आंबेडकरांना आदरांजली वाहताना दिसून आले. इतर समाजातील लोकसुद्धा मोठ्या उत्साहात प्रत्येक आयोजनात सहभागी होताना दिसले ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. एवढेच नाही तर शासकीय स्तरावर सुद्धा मनापासून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. परंतु शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीपैकी शिका या संदेशाचा अंमल बहुतांश ठिकाणी झाला. संघर्ष करण्याचा प्रयोग तर अनेक वर्षापासून होत आहे. परंतु मधला शब्द म्हणजे ‘संघटीत व्हा’ याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. यामध्ये स्वत:ला उपासक-उपासिका म्हणवून घेणारेच काही लोक जेव्हा संघटीत झालेले दिसून येत नाही. शिकले पण संघटीत झाले नाही, म्हणून संघर्ष करताना अनेकदा अपयश हाती येताना दिसते.सालेकसा तालुक्यात अनेक गावात बौद्ध समाज गटागटात, वर्गा-वर्गात व जाती-उपजातीचा आधार घेऊन विभागलेला आहे. याचा गैरफायदा स्वार्थाचे राजकारण करणारे लोक नेहमी घेत असतात. ही बाब समाजबांधवांनी समजून घेणे आवश्यक आहे. राजकारण करा, पण समाजाला विघटीत आत्मघाती व नुकसान देणारे राजकारण न करता बाबासाहेबांसाठी तरी स्वत: नमते घेत संघटित होऊन काम करणे आणि संघर्ष करणे गरजेचे आहे. तर बाबासाहेबांची खरे अनुयायी आहात हे सिद्ध होईल. प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या एका भारतीय महापुरुषाची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली. केवळ भारतच नाही तर यावर्षी १५६ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. याचा केवळ आंबडकरी जनतेलाच नाही तर तमाम भारतीयांना अभिमान असायला हवा. या तालुक्यात बाबासाहेबांच्या या शतकोत्तर जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करूया.