शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

महिन्याकाठी होतेय ८५ रूग्णांवर डायलेसिस

By admin | Updated: December 18, 2014 01:22 IST

किडनीचा आजार म्हटला की अंगारवर काटे आल्याशिवाय राहात नाहीत. शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम किडण्यांद्वारे होते.

गोंदिया : किडनीचा आजार म्हटला की अंगारवर काटे आल्याशिवाय राहात नाहीत. शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम किडण्यांद्वारे होते. मात्र किडनीचे कार्य पूर्णपणे बंद झाले तर ‘डायलेसिस’ ही प्रक्रिया करून कृत्रिमपणे रक्त शुद्धीकरणाचे काम करावे लागते. गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या डायलेसिस सुविधेमुळे अनेकांना नवजीवन मिळत आहे. गेल्या १३ महिन्यात सरासरी ८५ रूग्ण याप्रमाणे आतापर्यंत ११०९ रुग्णांवर डायलेसिसचा उपचार करण्यात आला आहे.नोव्हेंबर २०१३ मध्ये केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात किडनी आजाराच्या रूग्णांसाठी एक विशेष केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यात सध्या फिजीशियन म्हणून डॉ. प्रगती भोडे सेवा देत आहेत. तर नेफ्रोलॉजिस्ट म्हणून डॉ. वंदना बारस्कर या आठवड्यातून एक दिवस सेवा देतात. एवढ्या मोठ्या संख्येतील रूग्णांना नियमित सेवा देणे एकाच डॉक्टरला शक्य नसते. त्यामुळे या केंद्रात नियमित सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. डायलेसिस म्हणजे कृत्रिम किडणीद्वारे (मशिन) शरीरातील किडणीमधील घाण स्वच्छ केली जाते. कधीकधी एकाच रूग्णाला अनेकदा डायलेसिस करावे लागते. त्यांना एकाच दिवसात सुट्टी दिली जाते. तर नवीन किंवा गंभीर रूग्ण असल्या त्याला तीन ते चार दिवसपर्यंत रूग्णालयात दाखल रहावे लागते. क्वचितप्रसंगी अशा रूग्णांना अतिदक्षता गृहात (आयसीयू) दाखल करावे लागते. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालायात डायलेसिस प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मशिन्स, इंजेक्शन, रक्तवाढीच्या औषधी उपलब्ध आहेत. मात्र २४ तास नियमित सेवा देणाऱ्या त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. (प्रतिनिधी)