शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

परिसरातील प्रत्येक गावापर्यंत विकास कार्य पोहोचविले

By admin | Updated: September 22, 2014 23:21 IST

जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत.

अग्रवाल यांचे प्रतिपादन : ग्रा.पं. सदस्यांच्या संमेलनाची सांगतागोंदिया : जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत. झालेले विकास कार्य आपण सर्वांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. जिल्हा काँग्रेसद्वारे ग्रामपंचायत सदस्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत ग्रामपंचायतींना अधिकाधिक शक्ती देण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. गोंदिया तालुक्यात लोकशाहीचे प्रथम पायदान असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीपासून ते गावातील प्रत्येक विषयासाठी आम्ही मदत केली आहे. गोंदिया तालुक्याच्या विकासासाठी मी एक मास्टर प्लॉन तयार केलेला आहे. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे. वाघ नदीवर ५०० कोटींच्या खर्चाने मोठे बांध तयार करून तालुक्यातील सिंचन व्यवस्थेत वाढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. रोजगारोन्मुख शिक्षण देण्यासाठी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, नर्सिंग कॉलेज उघडले आहेत. संघर्ष करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणण्याचा आमचा उद्देश लवकरच पूर्ण होत आहे. त्यासाठी २५ एकर जमीन कुडवा येथे मिळवून दिली. तसेच कॉलेज चालविण्यासाठी शासनाने डीन म्हणून डॉ. केवलिया यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ५०० पदांची निर्मिती करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला. सभेत जि.प. सदस्य रमेशकुमार लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जुनी नागपुरे, मुनेंद्र नांदगाये, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभपती चमन बिसेन, कौशल्य बोपचे, लोकचंद दंदरे, मनिष मेश्राम, फत्तेचंद शेंडे, लक्ष्मी रहांगडाले, विद्या भालाधरे, रामेश्वर हरिणखेडे, दिगंबर बघेले आदींनी संबोधित केले. कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक अरूणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे, आशिषसिंह नागपुरे, जगदीश अग्रवाल, खेमन बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हाण, गेंदलाल शरणागत, छन्नू खरकाटे, सत्यम बहेकार तसेच तालुक्यातीलल सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)