शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून विकासशील, तर विरोधक म्हणतात विकासहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST

गोंदिया : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकट काळात हा अर्थसंकल्प सादर ...

गोंदिया : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकट काळात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने या अर्थसंकल्पात नेमका कुठल्या बाबींवर भर देण्यात येतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. त्यामुळे हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने विकासशील व सर्वसमावेशक आहे. शेतकऱ्यांच्या नावाने मोठा गाजावाजा करणाऱ्या मोदी सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा केली असली तरी उपन्न नेमके दुप्पट कसे करणार हे सांगितले नाही. कृषीसाठी पतपुरवठा दुप्पट करण्याची घोषणा केली असली तरी व्यापारी बँकाना शेतकऱ्यांना दारात उभ्या करीत नाही. त्यामुळे याचा सुद्धा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. रोजगार निर्मितीचा सुद्धा या अर्थसंकल्पात अभाव असून, विकासहीन संकल्प असल्याचा सूर विरोधकांनी आवळला.

......

पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू झाली आहे. या अर्थसंकल्पात ४ लाख कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक व १ लाख १० हजार कोटी रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी आणि ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद कोरोना लसीकरणासाठी करण्यात आली. या अर्थसंकल्पात आरोग्य आणि पायाभूत सुविधा विकासावर अधिक भर देण्यात आला असून, देशाला नवी दिशा देणार अर्थसंकल्प आहे.

- गोपालदास अग्रवाल, माजी आमदार

.....

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले बजेट राजकीय वा कॉस्मेटिक नाही. कृषी, रस्ते, रेल्वे, मेट्रो, गावांसह अन्य कल्याणकारी योजनानंतरही वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. कोरोना काळात संकटात सापडलेल्या उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. ग्रामीण सुधारणांचा हा अर्थसंकल्प आहे. आयकराचा टप्पा वाढवला नाही, ही जमेची बाजू आहे.

- परिणय फुके, आमदार

......

विकासाचा दर उंचावणारा व सर्व क्षेत्राला संतुलित प्रगतीसाठी चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. संकटात सापडलेल्या सामान्यांचे जीवनमान या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे वाढेल, ही अपेक्षा आहे.

-विजय रहांगडाले, आमदार

.....

कोरोना संकट काळात सादर करण्यात आलेला हा उत्कृष्ट अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, सूक्ष्म व लघु उद्योगांना बळ देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. करामध्ये कुठली वाढ करण्यात आली नसून टॅक्सप्रणाली पारदर्शक करण्यासाठी नवीन कायदे आणण्यात आले आहे.

- दिनेश दादरीवाल, सीए

......

हा अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भर करणारा आहे. आरोग्यासाठी अर्थसंकल्पात १३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकासाला वाव देणारा अर्थसंकल्प आहे. मात्र यात बचत आणि गुंतवणुकीसाठी विशेष तरतूद न करण्यात आल्याने थोडी निराशा झाली आहे.

- अविनाश ठाकूर, विकास अधिकारी, एलआयसी

.......

शेतकऱ्यांच्या नावाने गाजावाजा करणाऱ्या मोदी सरकारने या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची पूर्णपणे निराशा केली आहे. यात शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. कृषीला पत पुरवठ्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी व्यापारी बँका शेतकऱ्यांना दारात उभ्या करीत नसल्याने याचा फारसा उपयोग होणार नाही.

- गंगाधर परशुरामकर, प्रगतिशील, शेतकरी