श्वापदांचा धुमाकूळ : शेतकऱ्यांचे तहसीलदार, वनाधिकाऱ्यांना निवेदनअर्जुनी-मोरगाव : जंगलात गुरे चारण्यासाठी पैसे देऊनही पावती फाडली नाही. दरम्यान वाघाने गाय खाल्ली, मात्र पावती नसल्यामुळे शासकीय मोबदल्यापासून वंचित झाल्याचा आरोप देऊळगाव-बोदरा येथील भास्कर तुळशीराम सूर्यवंशी यांनी केला आहे. रोपवाटिका व कूप सोडून इतर जंगलात गुरेढोरे चारण्याची तरतूद आहे. यासाठी वनविभागातर्फे शुल्क आकारणी केली जाते. सूर्यवंशी यांनी दोन महिन्यापूर्वी बोदरा-देऊळगाव येथील वनरक्षक डोंगरे यांच्याकडे वारंवार पावतीची मागणी करीत होते. मात्र वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी सूर्यवंशी हे जंगलात गुरे चराईसाठी गेले असताना वन्यप्राण्याने गाय फस्त केली. वन्यप्राण्यांनी गुराढोरांची हत्या केल्यास शासनातर्फे शासकीय मोबदला दिला जातो. परंतु यासाठी शुल्क भरल्याची पावती असणे आवश्यक असते. पावती नसल्यामुळे सूर्यवंशी या मोबदल्यापासून वंचित झाले आहेत. सूर्यवंशी यांनी स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शासकीय मोबदल्यापासून वंचित
By admin | Updated: October 14, 2015 02:38 IST