शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

डासांना नष्ट करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी

By admin | Updated: October 21, 2014 22:55 IST

नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे.

गोंदिया : नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे. शहरवासी सध्या वेगळ्या समस्येला तोंड देत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरवासी त्रस्त झाले असून त्यांना रात्री झोपणे देखील अवघड झाले आहे. अशात डेंग्यूच्या प्रकोपाने शहरवासीयांत दहशत निर्माण झाली असून डांसावर आळा घालण्यासाठी पालिकेने सफाई व फवारणी अभियान राबवावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत. यावर्षी हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी थंडीचे प्रमाण बरेच कमी आहे. सध्या धान कापणीचा हंगाम जोमात आहे. या काळात धान पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. धान कापणीला काही काळ अकाली पावसामुळे विलंब झाला होता. यामुळे धान पिकांवरील डास शहरात पसरले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी पडत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे बोलल्या जात आहे. गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत सदैव उदासीन आहे. शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची नियमितपणे साफ-सफाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे अस्तव्यस्त स्वरूपात पसरले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या घाणीच्या प्रादुर्भावामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. रात्रीच्या वेळेस डास व किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शहरवासीयांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस घरातील दिवे सुरू ठेवणे देखील शहरवासीयांना अवघड झाले आहे. हे किडे चावा घेत असल्याने घरातील बालगोपाल. असुरक्षीत आहेत. किड्यांचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात कधीच नव्हता. यावर्षी थंडी कमी असल्याने व उष्णतेचे प्रमाण अजूनही काही प्रमाणात कायम असल्याने किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्या असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये आहे. कुठल्याही चौकात सध्या किडे हा चर्चेचा विषय झाला आहे. अद्यापही नगर परिषदेच्या वतीने शहरात डासनाशक फवारणी करण्यात नसल्याने शहरवासीयांमध्ये नगर प्रशासनाप्रति रोष आहे. शहरातील गटारांची व केरकचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची आहे. मात्र या विभागाकडून अद्यापही शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची साफसफाई न करण्यात आल्याने डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातल्या त्यात शहरातील सिव्हील लाईंन्स परिसरात डेंग्यूने थैमान घातल्याने शहरवासीयांत अधिकच दहशत निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून मात्र अद्याप ठोस पाऊलण्यात आले नसल्याचे दिसून येते. बघावे तेथे कचरा पडून असल्याने पालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह लागतो. तरी शहरात डासनाशक फवारणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)