शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

डासांना नष्ट करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी

By admin | Updated: October 21, 2014 22:55 IST

नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे.

गोंदिया : नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे. शहरवासी सध्या वेगळ्या समस्येला तोंड देत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरवासी त्रस्त झाले असून त्यांना रात्री झोपणे देखील अवघड झाले आहे. अशात डेंग्यूच्या प्रकोपाने शहरवासीयांत दहशत निर्माण झाली असून डांसावर आळा घालण्यासाठी पालिकेने सफाई व फवारणी अभियान राबवावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत. यावर्षी हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी थंडीचे प्रमाण बरेच कमी आहे. सध्या धान कापणीचा हंगाम जोमात आहे. या काळात धान पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. धान कापणीला काही काळ अकाली पावसामुळे विलंब झाला होता. यामुळे धान पिकांवरील डास शहरात पसरले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी पडत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे बोलल्या जात आहे. गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत सदैव उदासीन आहे. शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची नियमितपणे साफ-सफाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे अस्तव्यस्त स्वरूपात पसरले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या घाणीच्या प्रादुर्भावामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. रात्रीच्या वेळेस डास व किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शहरवासीयांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस घरातील दिवे सुरू ठेवणे देखील शहरवासीयांना अवघड झाले आहे. हे किडे चावा घेत असल्याने घरातील बालगोपाल. असुरक्षीत आहेत. किड्यांचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात कधीच नव्हता. यावर्षी थंडी कमी असल्याने व उष्णतेचे प्रमाण अजूनही काही प्रमाणात कायम असल्याने किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्या असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये आहे. कुठल्याही चौकात सध्या किडे हा चर्चेचा विषय झाला आहे. अद्यापही नगर परिषदेच्या वतीने शहरात डासनाशक फवारणी करण्यात नसल्याने शहरवासीयांमध्ये नगर प्रशासनाप्रति रोष आहे. शहरातील गटारांची व केरकचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची आहे. मात्र या विभागाकडून अद्यापही शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची साफसफाई न करण्यात आल्याने डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातल्या त्यात शहरातील सिव्हील लाईंन्स परिसरात डेंग्यूने थैमान घातल्याने शहरवासीयांत अधिकच दहशत निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून मात्र अद्याप ठोस पाऊलण्यात आले नसल्याचे दिसून येते. बघावे तेथे कचरा पडून असल्याने पालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह लागतो. तरी शहरात डासनाशक फवारणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)