शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

जंगलात कृत्रिम पाणवठ्याची संख्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व गोठणगाव परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबटसारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर वाढला आहे. यातूनच मानवांवर हल्ला करून कित्येकांना ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठार केल्याच्याही कित्येक घटना घडल्या आहेत. अनेकांना परिसरात प्रत्यक्षरित्या बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात येतात गावात : मानव व प्राण्यावरील हल्ल्यांचे हेच कारण

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यप्राण्यांचा परिसरातील गावात शिरकाव वाढला आहे. पाण्यासाठी प्राण्यांचा गावात शिरकाव थांबविण्यासाठी गोठणगाव व परिसरातील जंगलात कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व गोठणगाव परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबटसारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर वाढला आहे. यातूनच मानवांवर हल्ला करून कित्येकांना ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठार केल्याच्याही कित्येक घटना घडल्या आहेत. अनेकांना परिसरात प्रत्यक्षरित्या बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. वनविभागातील अधिकारी-कर्मचारी सतत लक्ष ठेवून असले तरीही मानवावर वन्यप्राण्यांकडून हल्ला करणे सुरूच आहे.विशेष म्हणजे, आता उन्हाळा सुरू झाला असून जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटून पाणी नाहीसे होणार. अशात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावात शिरतात. यातूनच मानव गावातील प्राण्यांवरील हल्ल्यांना सुरुवात होते. या वन्यप्राण्यांना जंगलातच पाण्याची सोय झाल्यास त्यांचा गावातील शिरकाव होणार नाही व अप्रिय घटना घडणार नाहीत. यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन केशोरी आणि गोठणगाव जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवून प्राण्यांचा गावाकडे होणारा वावर थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवWaterपाणी