शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसानंतरही तूट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:07 IST

जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देसरासरी ७४ टक्के पावसाची नोंद: बळीराजा लागला कामाला, प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शुक्रवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम होता त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ दाखविल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र जुलै महिन्याच्या अखेरी आणि आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर पिकांना दिलासा मिळाला आहे.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. दरम्यान गुरूवारी पुजारीटोला धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे बाघ नदीच्या पाणी पातळी वाढ झाली होती.शुक्रवारी केवळ या धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता.जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३९.७९ मि.मी.पावसाची नोंद तर तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. मागील वर्षी ९ आॅगस्टपर्यंत ८५ टक्के पावसाची नोंद झाली होती तर यंदा याच तारखेपर्यंत ७४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दमदार पावसानंतरही ११ टक्के पावसाची तूट कायम आहे. पुन्हा दोन तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास ही तूट भरुन निघण्याची शक्यता आहे.न.प.शाळेला लागली गळतीशहरातील छोटा गोंदिया येथील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल या शाळेची इमारत जीर्ण झाली असून त्याची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे छताला गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे कठीण झाले आहे. तर शालेय पोषण आहार तयार करण्याच्या ठिकाणी सुध्दा पाणी गळत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी शाळेला भेट देऊन पाहणी केल्याची माहिती आहे.रजेगाव पुलावरील पाणी पातळीत घटगोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव येथील बाघ नदीच्या जुन्या पुलावरुन गुरुवारी एक ते दीड मिटर पाणी वाहत होते.शुक्रवारी यात घट झाली असून पुलावरुन पाणी वाहत नव्हते.मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.घरांची पडझडजिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी घरे आणि गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे.महसूल विभागाने पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.तीन महसूल मंडळात अतिवृष्टीशुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.७९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये खमारी ७९ मि.मी, परसवाडा ८०.२० मि.मी., ठाणेगाव ८५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.रोवणीच्या कामाला वेगजिल्ह्यात पावसाअभावी रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती.त्यामुळे मागील आठवड्यात केवळ १६ टक्के रोवण्या झाल्याची नोंद होती. तर मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले आणि शेतांमध्ये पाणी साचल्याने रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतमजुरांच्या हाताला सुध्दा काम मिळाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर