शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गाव तलावाचे खोलीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण ...

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी गावालगत असलेला तलाव गावाच्या सौंदर्यात भर घालणारा असून, शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील ५० टक्के शेतजमीन या तलावाच्या सिंचनाखाली येत आहे. येथील पाण्यापासून शेतीला चांगलाच उपयोग होऊन गावातील विहिरीची पाणी क्षमता सतत टिकून राहत असते. गावतलावातील सभोवतालच्या जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जागा काबीज केली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी सिंचनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या काळात जर अशीच परिस्थिती राहिली, तर गावातील जनावरांना पिण्याचे पाणी मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कंत्राटदारामार्फत पाळीची दगड लावून पिचिंग करून डागडुजी केली. खोलीकरणाच्या दृष्टीने कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. या तलावातील खाली जागेचे खोलीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. शेतीच्या उत्पन्नाकरिता सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या गावतलावाचे खोलीकरण करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.