शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

गाव तलावाचे खोलीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण ...

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी गावालगत असलेला तलाव गावाच्या सौंदर्यात भर घालणारा असून, शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील ५० टक्के शेतजमीन या तलावाच्या सिंचनाखाली येत आहे. येथील पाण्यापासून शेतीला चांगलाच उपयोग होऊन गावातील विहिरीची पाणी क्षमता सतत टिकून राहत असते. गावतलावातील सभोवतालच्या जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जागा काबीज केली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी सिंचनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या काळात जर अशीच परिस्थिती राहिली, तर गावातील जनावरांना पिण्याचे पाणी मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कंत्राटदारामार्फत पाळीची दगड लावून पिचिंग करून डागडुजी केली. खोलीकरणाच्या दृष्टीने कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. या तलावातील खाली जागेचे खोलीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. शेतीच्या उत्पन्नाकरिता सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या गावतलावाचे खोलीकरण करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.