शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गाव तलावाचे खोलीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण ...

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी गावालगत असलेला तलाव गावाच्या सौंदर्यात भर घालणारा असून, शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील ५० टक्के शेतजमीन या तलावाच्या सिंचनाखाली येत आहे. येथील पाण्यापासून शेतीला चांगलाच उपयोग होऊन गावातील विहिरीची पाणी क्षमता सतत टिकून राहत असते. गावतलावातील सभोवतालच्या जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जागा काबीज केली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी सिंचनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या काळात जर अशीच परिस्थिती राहिली, तर गावातील जनावरांना पिण्याचे पाणी मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कंत्राटदारामार्फत पाळीची दगड लावून पिचिंग करून डागडुजी केली. खोलीकरणाच्या दृष्टीने कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. या तलावातील खाली जागेचे खोलीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. शेतीच्या उत्पन्नाकरिता सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या गावतलावाचे खोलीकरण करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.