शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:26 IST

यंदा जिल्ह्यात सर्वत्र अनियमित पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ज्या शेतीला सिंचनाची सोय आहे तेथेच पीक दिसत आहे. परंतु ते सुद्धा मावा, तुडतुडा या कीडरोगाने नष्ट झाले आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : ओबीसी संघर्ष कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरबांध : यंदा जिल्ह्यात सर्वत्र अनियमित पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ज्या शेतीला सिंचनाची सोय आहे तेथेच पीक दिसत आहे. परंतु ते सुद्धा मावा, तुडतुडा या कीडरोगाने नष्ट झाले आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पऱ्हे  लावलेच नाही त्यांची स्थिती अधिक बिकट आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा, अशी मागणी ओबीसी कृती समितीच्या वतीने देवरीचे तहसीलदार बी.टीे. यावलकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी दिलेल्या निवेदनात शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. त्यातच त्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार म्हणून कर्ज भरले नाही. त्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. महाराष्ट्र  सरकारतर्फे शेतकऱ्यांना दहा हजार सहायता राशी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांना दमडीसुद्धा मिळाली नाही. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु, शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होणार, असे फसवे आश्वासन शासनाने देवून विश्वासघात केल्याचा आरोप ओबीसी संघर्ष कृतीने केला आहे. या संपूर्ण परिस्थितीची वेळीच दखल घेवून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.सध्या निसर्गाचा लहरीपणा बघून शेतकरी जागा झाला आहे. आपल्या पिकाला विमा कवच पिकांचा पीक विमा काढत आहे. परंतु सरकार व विमा कंपन्या पीक विम्याचे निकष स्पष्ट करीत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहे. शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे विमा कंपन्यांच्या सरळ घशात जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. शेतकऱ्याचे होत असलेले शोषण थांबवून पीक विम्याचे निकष बदलवून सरसकट विम्याचा लाभ शेतकऱ्याना मिळण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा पीक विमा प्रकरणी दिशाभूल करणाऱ्या दोषींवर शेतकरी आत्महत्येस कारणीभूत म्हणून खुनाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणीसुद्धा समितीतर्फे करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग, विजा, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन प्रक्रियेद्वारे मागविण्यात आले. आॅनलाईन अर्ज करताना विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामध्ये साईट नियमित न चालणे, ग्रामीण भागात सुविधा केंद्र उपलब्ध नसणे, मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांना सोसावा लागत असून शिक्षण पूर्ण होत नसल्याचा आरोप आहे. या घटकातील विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित होणार नाही त्याकरिता शासनाने उचित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.शासन-प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्यासंबंधी तात्काळ पाऊल उचलावे अन्यथा या विरोधात कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या सर्व मागण्या त्वरीत मार्गी लावण्याची मागणी ओबीसी संघर्ष कृषी समिती, सेवासंघ, महासंघ केली आहे.सदर आशयाचे निवेदन नायब तहसीलदार बी.टी. यावलकर यांना देण्यात आले. शिष्टमंडळात सुदर्शन लाडेकर, राजेश भाजीपाले, राजेश भूते, विक्रम बंजारी, मधुकर मादाडे, मुकेश कावळे, प्रकाश लांजेवार, कापसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी