शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

कर्जवसुली स्थगितीतून जिल्ह्याला डच्चू

By admin | Updated: March 14, 2016 01:53 IST

जिल्ह्यातील १०९ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाठविला.

शासनाचा तुघलकी निर्णय : परशुरामकर यांचा आरोपगोंदिया : जिल्ह्यातील १०९ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाठविला. परंतु राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ११ मार्च रोजी सन २०१५-१६ च्या खरीप व रबी हंगामात हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यासंबंधीचा जो आदेश काढला. त्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्व गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे. जिल्ह्यात एकूण ९५५ गावे असून पिक नसलेली ३४ गावे आहेत. उर्वरीत ९२१ गावांत सुमारे एक लक्ष ८८ हजार २६२ हेक्टर जमिनीवर धानाचे पिक घेतल्या गेले. जिल्हा प्रशासनाने हंगामी पैसेवारी काढताना देवरी तालुक्यातील फक्त ४४ गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्या आत दाखविली होती. परंतू संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओरड केल्यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी काढताना गोरेगाव तालुक्यातील २३ गावे, देवरी तालुक्यातील ६८ गावे, सालेकसा तालुक्यातील १३ गावे, आमगाव तालुक्यातील ५ गावे अशा एकूण १०९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या अत दाखविण्यात आली. तर उर्वरित ८१२ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या वर दाखविण्यात आली होती. सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव (महसूल व वनविभाग) यांना ३१ डिसेंबर २०१५ रोजी सादर केला. परंतू शासनाने ११ मार्च २०१६ ला सन २०१५-१६ च्या खरीप व रबी हंगामात हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावात सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने जो आदेश काढला त्यात गोंदिया जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशांच्या अत दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शासनाच्या या योजनेचा लाभ एकाही गावाला मिळू नये हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आहे. त्यामुळे सरकारच येथील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना थाटामाटात सुरू केल्याचे जाहीर केले. पूर्वीच्या सरकारने या आकाराच्या शेततळ््याला ८७ हजार रूपयांचे अनुदान दिले जात होते. या सरकारने हे अनुदान ५० हजार रूपयांवर आणले असून ज्या गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे त्याच गावांना या योजनेचा फायदा लाभ मिळेल असे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत नसल्याने या योजनेचा फायदाही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता येणार नाही, असा आरोपही परशुरामकर यांनी केला आहे.