शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा मृत्यू, व्यापाऱ्याची हत्या गुलदस्त्यात

By admin | Updated: March 26, 2015 01:12 IST

फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातील दोन मोठ्या घटनांनी आमगाव तालुका हादरून गेला आहे.

आमगाव : फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातील दोन मोठ्या घटनांनी आमगाव तालुका हादरून गेला आहे. एका घटनेत शिवनी येथील तरुणीचा मृतदेह रेल्वे रूळावर संशयास्पदरित्या आढळला तर दुसऱ्या घटने बिर्शी येथील तरुण व्यापाऱ्याची हत्या झाली. मात्र दोन्ही घटनेचा छडा लावण्यात आमगाव पोलिसांना यश आले नाही.शिवनी येथील शाळकरी मुलीचा मृत्यू फेब्रुवारी महिन्यात झाला. त्या मुलीच्या मृत्यूमागे नेमके कारण काय याचा छडा पोलीस लावू शकले नाही. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बिर्शी येथील किराणा व्यापाऱ्याचा खून झाला. दोन्ही प्रकरणे गुुलदस्त्यात आहेत.शाळकरी मुलीचा मृतदेह जवरी परिसरातील रेल्वे रूळावर आढळला. जर ती मुलगी रेल्वेने मरण पावली तर तिचे शरीर छिन्नविछिन्न झाले असते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. गावात व परिसरात नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा आहे. चार वर्षापूर्वी अशाच प्रकारची घटना एका शाळकरी मुलीच्या संदर्भात घडली होती. नागरिक समोर येऊन बोलत नसले तरी शिवनी येथील मुलीचा मृत्यू रेल्वेने कटून झालेला नसून त्यामागे नेमके कोणते तरी रहस्य असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांकडून तपासाच्या नावावर केवळ भुलथापा देणे सुरू आहे. त्यामुळे आरोपींना संरक्षण देण्याची तर पोलिसांची भूमिका नाही ना, अशी शंका नागरिक घेऊ लागले आहेत.१७ मार्चला बिर्शी येथील किराणा दुकानदाराची त्यांच्याच घरात हत्या झाली. चौकशीच्या नावावर गावातील शेतकरी-शेतमजुरांना उचलून त्यांची झाडाझडती सुरू आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी याप्रमाणे पोलिसाचे काम सुरू आहे. किराणा दुकानदार आपल्या घरी एकटेच राहत होते. गावात त्यांच्या चारित्र्यावर एक शब्दही कोणी बोलायला तयार नाही. एवढी त्याने आपली प्रतिमा बनवून ठेवली अशी गावात चर्चा आहे. मग अशा व्यक्तीची हत्या किंवा खून का झाला? एक तर यातील नेमके उत्तर म्हणजे त्या दुकानदाराजवळील अनुभवी व जाणकार व्यक्तीचा कदाचित सहभाग असावा. एकतर चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात गेले असतील, मात्र यात एका व्यक्तीचा सहभाग नाही. दुसरा मुद्दा म्हणजे त्याच्या घरी जाऊन त्याचा खून झाला त्यावेळी त्या इंदलाल लालवानीने बचावासाठी आरडाओरड केली असावी किंवा मारेकऱ्यांनी मारले तेव्हा इंदलाल मरण पावला नव्हता. त्यानंतर सुध्दा मदतीसाठी तो ओरडला असावा. मात्र त्याचा आवाज घराजवळील कुणापर्यंत कसा पोहचला नाही किंवा आवाज पोहोचून परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात का दिला नाही? अशाप्रकारे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र आमगाव पोलिसांच्या हाती अजून काहीही लागले नाही. दोन महिन्यात दोन घटना घडल्या असताना पोलीस केवळ भूलथापा देऊन केवळ वेळकाढूपणा दाखवत आहे. दोन्ही तपास गुलदस्त्यात असत्याने अनेक तर्कविकर्ताना ऊत आला आहे. (तालुका प्रतिनिधी)