शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच, ग्रामीण भागात लसीकरणासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील शहरी ...

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील शहरी आणि ग्रामीण भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला घेऊन विविध अफवांना सुरुवात झाली. त्यामुळे याचा परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे. लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात, लस घेतल्याने मृत्यू होतो, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, व्यक्ती निपुत्रिक होते, लस घेतल्याने अकाली मृत्यू होतो अशा अफवा नागरिकांमध्ये होत्या. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र या अफवांवर विश्वास न ठेवू नका, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये झालेले गैरसमज दूर करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री गावकऱ्यांना पटवून देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांनाही चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.

..................

काय आहेत अफवा....

शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, खूप ताप येतो आणि चक्कर येऊन मृत्यू होतो, अशी अफवा गोंदिया तालुक्यातील नागरा, रजेगाव, रावणवाडी, कामठा या परिसरांतील गावकऱ्यांमध्ये पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. मात्र ही केवळ अफवा असल्याचे सांगून, गावातील तरुण आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांचा संभ्रम दूर केला.

...............

निपुत्रिक होण्याची शक्यता

लस घेतल्यानंतर निपुत्रिक होण्याची शक्यता असते, अशीही अफवा ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे गावातील महिला लसीकरणासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि शिक्षकांनी पुढाकार घेत त्यांच्यातील शंका दूर करण्याचे काम केले. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घेण्यास सांगितले.

.....

लस घेतल्याने होतो मृत्यू

कोरोनाची लस घेतल्यानंतर सात-आठ दिवसांनी मृत्यू होतो, अशी अफवा सर्वाधिक ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांमध्ये पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर येत नव्हते. यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांचे गैरसमज दूर केले. त्यानंतर लसीकरणासाठी नागरिक पुढे येऊ लागले.

...............................

गावकरी संभ्रमात

सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे असे ठरविले होते. मात्र गावात लसीकरणासंदर्भात विविध अफवा सुरू झाल्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने लस घेणे टाळले होते. मात्र गावातील पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले व गैरसमज दूर केले. त्यानंतर केंद्रावर जाऊन लस घेतली.

- एक ग्रामस्थ, नागरा

.......................

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी तिची अफवा पहिली होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा अशा अफवांवर लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणाचे झाले. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्याने लस घेतली.

- एक ग्रामस्थ, कामठी

.................

अधिकारी म्हणतात....

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील प्रतिबंधात्मक लस हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी बिनधास्तपणे लस घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्याधिकारी.

....................

ग्रामीण भागात झालेले लसीकरण

आरोग्य कर्मचारी ५४३६ ३५४२ २३४

फ्रंटलाईन वर्कर्स ११६५४ ९८७६ २४३५

ज्येष्ठ नागरिक ४६४३२ ३३४५३ १०८६५

४५ ते ६० वयोगट ३५४७७ २८७६५ ३४५३

१८ ते ४४ वयोगट ४३२१ ० २५४३५