शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच, ग्रामीण भागात लसीकरणासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील शहरी ...

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील शहरी आणि ग्रामीण भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला घेऊन विविध अफवांना सुरुवात झाली. त्यामुळे याचा परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे. लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात, लस घेतल्याने मृत्यू होतो, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, व्यक्ती निपुत्रिक होते, लस घेतल्याने अकाली मृत्यू होतो अशा अफवा नागरिकांमध्ये होत्या. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र या अफवांवर विश्वास न ठेवू नका, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये झालेले गैरसमज दूर करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री गावकऱ्यांना पटवून देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांनाही चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.

..................

काय आहेत अफवा....

शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, खूप ताप येतो आणि चक्कर येऊन मृत्यू होतो, अशी अफवा गोंदिया तालुक्यातील नागरा, रजेगाव, रावणवाडी, कामठा या परिसरांतील गावकऱ्यांमध्ये पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. मात्र ही केवळ अफवा असल्याचे सांगून, गावातील तरुण आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांचा संभ्रम दूर केला.

...............

निपुत्रिक होण्याची शक्यता

लस घेतल्यानंतर निपुत्रिक होण्याची शक्यता असते, अशीही अफवा ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे गावातील महिला लसीकरणासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि शिक्षकांनी पुढाकार घेत त्यांच्यातील शंका दूर करण्याचे काम केले. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घेण्यास सांगितले.

.....

लस घेतल्याने होतो मृत्यू

कोरोनाची लस घेतल्यानंतर सात-आठ दिवसांनी मृत्यू होतो, अशी अफवा सर्वाधिक ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांमध्ये पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर येत नव्हते. यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांचे गैरसमज दूर केले. त्यानंतर लसीकरणासाठी नागरिक पुढे येऊ लागले.

...............................

गावकरी संभ्रमात

सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे असे ठरविले होते. मात्र गावात लसीकरणासंदर्भात विविध अफवा सुरू झाल्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने लस घेणे टाळले होते. मात्र गावातील पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले व गैरसमज दूर केले. त्यानंतर केंद्रावर जाऊन लस घेतली.

- एक ग्रामस्थ, नागरा

.......................

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी तिची अफवा पहिली होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा अशा अफवांवर लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणाचे झाले. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्याने लस घेतली.

- एक ग्रामस्थ, कामठी

.................

अधिकारी म्हणतात....

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील प्रतिबंधात्मक लस हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी बिनधास्तपणे लस घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्याधिकारी.

....................

ग्रामीण भागात झालेले लसीकरण

आरोग्य कर्मचारी ५४३६ ३५४२ २३४

फ्रंटलाईन वर्कर्स ११६५४ ९८७६ २४३५

ज्येष्ठ नागरिक ४६४३२ ३३४५३ १०८६५

४५ ते ६० वयोगट ३५४७७ २८७६५ ३४५३

१८ ते ४४ वयोगट ४३२१ ० २५४३५