शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

खांबी येथील जवानांचा आजाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:16 PM

देशसेवा करीत असतांना आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या खांबी (पिंपळगाव) येथील वीर सुपुत्राला सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील जनसमुदाय उपस्थित होता.

ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार : जनसमुदायाची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : देशसेवा करीत असतांना आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या खांबी (पिंपळगाव) येथील वीर सुपुत्राला सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील जनसमुदाय उपस्थित होता.खांबी येथील अतिराज बाबुराव भेंडारकर (३३) हा त्रिपुरा इस्टेट रायफल्सच्या तिसऱ्या तुकडीत कर्तव्यावर होता. कर्तव्य बजावत असतांना त्याची प्रकृती बिघडली. तो गेल्या ७ ते ८ दिवसांपासून मधूमेहाने त्रस्त होता. अचानक शनिवारी (दि.२३) पहाटे पावणे पाच वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या तुकडीत तो एकमेव महाराष्ट्रीय होता. त्याने १३ वर्ष सैन्यदलात कर्तव्य बजावले. त्याचे मृत्यूनंतर त्याला त्रिपुरा येथून रायपूरपर्यंत विमानाने आणण्यात आले व रायपूरवरुन खांबी येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. रविवारी रात्री सुमारे १०.१५ वाजताच्या दरम्यान त्याचे पार्थिव गावात येताच अत्यंत शोकमग्न वातावरण झाले.पार्थिवासोबत अतिराजचे कुटूंबीय तसेच सैन्यदलाच्या त्याच तुकडीतील रायफलमन टूमन शाहू सोबत होते. सोमवारी सकाळी अतिराजचे पार्थिव बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी, नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता त्याचे राहते घरातून अंत्ययात्रा निघाली. वीर जवान अमर रहे, अशा गर्जना व देशभक्तीपर गीताच्या निनादात ही अंत्ययात्रा खांबी गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत स्मशानघाटावर पोहोचली.तिथे पालकमंत्री राजकुमार बडोले, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे, अरविंद शिवणकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. गोंदिया पोलिसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. मुलगा अंशूल व तीन भावंडानी मुखाग्नी दिला.खांबीचा वीर जवान अनंतात विलीन झाला.या वेळी बडोले, शिवणकर, सरपंच प्रकाश शिवणकर, प्रमोद पाऊलझगडे, लायकराम भेंडारकर, नेमीचंद मेश्राम, कृष्णकांत खोटेले, सुरेंद्रकुमार ठवरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.मंगळवारी गावाकडे येणार होता१९ फेब्रुवारीला अचानक वडीलांचे निधन झाले. याप्रसंगी अतिराज गावाकडे आला होता. काही दिवसांपूर्वीच तो येथून त्रिपुराला गेला. त्याची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वस्थतेनंतर घरी आराम करावे म्हणून मंगळवारी २६ मार्चला तो गावाकडे (खांबी) येणार होता. त्याचे तिकीट सुध्दा आरक्षित झाले होते. पण हे नियतीला मान्य नव्हते. अखेर त्याचा मृतदेह एक दिवसांपूर्वी गावात पोहोचला. या सर्व घटनाक्रमामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.बाबांच्या अंगावर लाकडे का ठेवली?वीर जवानाची अंत्ययात्रा स्मशानघाटात पोहोचली. सरण रचले जात होते. अतिराजच्या शवावर लाकडे ठेवण्यात आली. मुखाग्नी देतेवेळी वीरपुत्राचा चिरंजीव अंशूलला आणण्यात आले. त्यावेळी बाबा...बाबा! बाबाच्या अंगावर लाकडे का ठेवली. बाबांना का बर आग लावली असा प्रश्न अंशूलने करताच अनेकांचे डोळे पाणावले, तीन वर्षाचा अंशूल के.जी.वनमध्ये शिकतो. अतिराजच्या मागे, पत्नी, वृध्द आई, तीन भावंड व मुलगा अंशूल व आप्त परिवार आहे.