शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही  त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार जमीनदोस्त करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच  समता बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्तवतीने गुरुवारपासून (दि.२८) येथील जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही  त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला समाजकंटकांनी गालबोट लावले होते, हे विशेष. या आंदोलनाची दखल घेत २ दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देत  जिल्हा प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोषींवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर भारतीय बौद्ध महासभा आमगावचे कार्यकर्ते योगेश रामटेके, मोरवाही येथील विजय मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम तसेच इतर समाजबांधवांनी गुरुवारपासून (दि. २८) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता जिल्हा प्रशासन दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

२ महिने लोटूनही कारवाई नाहीच जिल्हा प्रशासनाने दोषींवर २ दिवसांत कारवाई करू, असे आश्वासन देत ऑगस्ट महिन्यात आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु आश्वासनांना २ महिने उलटले तरी, अद्याप जिल्हा प्रशासनाने दोषी व्यक्तींवर कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान, दोषी कंत्राटदार व दंगल घडविणाऱ्यांविरुद्ध पोलीस तकार नोंदविण्यात आली. आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने मोरवाहीवासीयांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

 

टॅग्स :agitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी