शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही  त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार जमीनदोस्त करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच  समता बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्तवतीने गुरुवारपासून (दि.२८) येथील जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही  त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला समाजकंटकांनी गालबोट लावले होते, हे विशेष. या आंदोलनाची दखल घेत २ दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देत  जिल्हा प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोषींवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर भारतीय बौद्ध महासभा आमगावचे कार्यकर्ते योगेश रामटेके, मोरवाही येथील विजय मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम तसेच इतर समाजबांधवांनी गुरुवारपासून (दि. २८) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता जिल्हा प्रशासन दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

२ महिने लोटूनही कारवाई नाहीच जिल्हा प्रशासनाने दोषींवर २ दिवसांत कारवाई करू, असे आश्वासन देत ऑगस्ट महिन्यात आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु आश्वासनांना २ महिने उलटले तरी, अद्याप जिल्हा प्रशासनाने दोषी व्यक्तींवर कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान, दोषी कंत्राटदार व दंगल घडविणाऱ्यांविरुद्ध पोलीस तकार नोंदविण्यात आली. आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने मोरवाहीवासीयांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

 

टॅग्स :agitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी