शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढला ! तालुक्यात निघाले ३ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST

गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही ...

गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही शुक्रवारी (दि. १७) गोंदिया तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. यामुळे आता धोका वाढताना दिसत असून, नागरिक मनमर्जीने वागताना दिसत आहेत. यावर मात करण्यासाठी आता खबरदारी व लस या दोनच गोष्टींची गरज आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगाला थरकाप आणणारा आहे. त्यानंतर शासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन व लवकरात लवकर लसीकरण या दोनच गोष्टींवर भर देण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने नागरिकांनी नियम व लस या दोघांनाही बाजूला टाकले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून, गर्दी वाढतच चालली आहे. परिणामी धोकाही वाढत असून, शुक्रवारी (दि. १७) तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. मागील २-३ महिन्यांतील ही सर्वाधिक आकडेवारी दिसून येत आहे.

त्यातही गोंदिया तालुका हॉटस्पॉट असून, येथेच सर्वाधिक बाधित व मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. आता त्यात आणखी ३ बाधितांची भर म्हणजे, धोक्याची घंटाच वाटत आहे. अशात आतातरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून, सध्या फक्त गोंदिया तालुकाच कोरोना बाधित दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी पुढचा धोका टाळण्यासाठी आतापासून नियमांचे पालन व लसीकरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

-----------------------------------

लसीकरणाची गती मंदावली

जिल्ह्यात मध्यंतरी दररोज १५,००० ते १६,००० नागरिकांचे दररोज लसीकरण होत होते. यामुळेच आता जिल्ह्याने ९,३१,५८० नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला असून, त्याची टक्केवारी ९० टक्के एवढी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोजची आकडेवारी ११,००० च्या आतच दिसून येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावयाचे असल्याने ही स्थिती व्यवस्थित नाही. करिता आता नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन सुरक्षित व्हायची गरज आहे.

-------------------------------

दुसरा डोस गरजेचा

जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने कित्येकांनी आता कोरोना गे,ला असा संभ्रम पाळून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर फक्त २३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यावरून नागरिकांनी आता कोरोना नसल्याने डोस घेण्याची गरजच काय, अशी समज बाळगल्याचे दिसते. मात्, दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षा नाही. करिता लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याची गरज आहे.