शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धोका वाढला ! तालुक्यात निघाले ३ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST

गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही ...

गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही शुक्रवारी (दि. १७) गोंदिया तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. यामुळे आता धोका वाढताना दिसत असून, नागरिक मनमर्जीने वागताना दिसत आहेत. यावर मात करण्यासाठी आता खबरदारी व लस या दोनच गोष्टींची गरज आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगाला थरकाप आणणारा आहे. त्यानंतर शासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन व लवकरात लवकर लसीकरण या दोनच गोष्टींवर भर देण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने नागरिकांनी नियम व लस या दोघांनाही बाजूला टाकले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून, गर्दी वाढतच चालली आहे. परिणामी धोकाही वाढत असून, शुक्रवारी (दि. १७) तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. मागील २-३ महिन्यांतील ही सर्वाधिक आकडेवारी दिसून येत आहे.

त्यातही गोंदिया तालुका हॉटस्पॉट असून, येथेच सर्वाधिक बाधित व मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. आता त्यात आणखी ३ बाधितांची भर म्हणजे, धोक्याची घंटाच वाटत आहे. अशात आतातरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून, सध्या फक्त गोंदिया तालुकाच कोरोना बाधित दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी पुढचा धोका टाळण्यासाठी आतापासून नियमांचे पालन व लसीकरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

-----------------------------------

लसीकरणाची गती मंदावली

जिल्ह्यात मध्यंतरी दररोज १५,००० ते १६,००० नागरिकांचे दररोज लसीकरण होत होते. यामुळेच आता जिल्ह्याने ९,३१,५८० नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला असून, त्याची टक्केवारी ९० टक्के एवढी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोजची आकडेवारी ११,००० च्या आतच दिसून येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावयाचे असल्याने ही स्थिती व्यवस्थित नाही. करिता आता नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन सुरक्षित व्हायची गरज आहे.

-------------------------------

दुसरा डोस गरजेचा

जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने कित्येकांनी आता कोरोना गे,ला असा संभ्रम पाळून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर फक्त २३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यावरून नागरिकांनी आता कोरोना नसल्याने डोस घेण्याची गरजच काय, अशी समज बाळगल्याचे दिसते. मात्, दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षा नाही. करिता लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याची गरज आहे.