शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

डेमू हुई बंद और मेमू भी नही चली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:44 IST

गोंदिया-बल्लारशा व गोंदिया समनापूर दरम्यान १५ मार्चपासून मेमू रेल्वे गाडीची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारपासून (दि.१५) ही सेवा सुरू न झाल्याने या दोन्ही मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. तर ‘डेमू हुई बंद और मेमू भी नही चली’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

ठळक मुद्देहजारो प्रवाशांना फटका : रेल्वे विभागाचे अजब धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-बल्लारशा व गोंदिया समनापूर दरम्यान १५ मार्चपासून मेमू रेल्वे गाडीची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारपासून (दि.१५) ही सेवा सुरू न झाल्याने या दोन्ही मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. तर ‘डेमू हुई बंद और मेमू भी नही चली’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.गोंदिया-बल्लारशा, बल्लारशा ते गोंदिया दरम्यान पॅसेंजर आणि गोंदिया ते समनापूर, समनापूर ते गोंदिया दरम्यान डेमू रेल्वे गाडी दिवसातून सहा फेऱ्या मारते. या रेल्वे गाडीला डेमू म्हटले जात होते. मात्र रेल्वे विभागाने दोन दिवसांपूर्वी एक पत्र काढून शुक्रवारपासून (दि.१५) डेमू ऐवजी मेमू रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा केली. तसेच डेमू ट्रेन बंद केली. मात्र त्याऐवजी मेमू ट्रेन सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी पोहचण्यासाठी अडचण निर्माण झाली.शेकडो प्रवाशांना रेल्वे स्थानकावरुन आल्या पावलीच परत जावे लागले. रेल्वे नियोजन चुकण्यामागील कारण मेमूचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार होती. त्यामुळे या विभागाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळेच हा सर्व प्रकार टाळण्यासाठी शुक्रवारपासून ही मेमू सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.डब्यांच्या बैठक व्यवस्थेत करणार बदलप्राप्त माहितीनुसार या दोन्ही मार्गावर सुरू असणाऱ्या डेमू गाडीला १४ डब्बे होते. त्यामुळे प्रत्येक फेरीत ११४२ प्रवाशांना जागा मिळत होती. मात्र मेमू गाडी सुरू केल्यानंतर केवळ ८ डब्बेच लावण्यात आले. त्यामुळे केवळ ७९६ प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार होती. ही बाब रेल्वे विभागाच्या उशीरा लक्षात आल्यामुळे त्यांनी १२ डब्ब्यांची मेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून त्यात बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. यामुळे जवळपास १२४० प्रवासी या गाडीतून प्रवास करु शकणार आहेत. डब्बे तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.बदलाचा प्रवाशांना काय होणार फायदागोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-समनापूर दरम्यान डेमू ऐवजी मेमू रेल्वे गाडी चालविल्यामुळे प्रवाशांना काय फायदा होईल असा सवाल उपस्थित केला जात आहे. डेमू गाडी ही डिझेलवर तर मेमू गाडी विजेवर धावते. त्यामुळे प्रवाशांच्या नियोजित स्थळी लवकर पोहचणे शक्य होणार आहे. सध्या गाड्यांच्या वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नाही. मात्र ट्रायल घेतल्यानंतर त्यात बदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :railwayरेल्वे