शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी बंधारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 08:38 IST

Gondia News वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्दे लोकसहभाग १३ गावांत उपक्रमवन्यप्राण्यांची भागविली जात आहे तृष्णा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणवठे व पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अशात वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत असतो, तर बरेचदा शिकारीचे प्रकारसुद्धा घडतात. या प्रकाराला आळा बसावा व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गोंदिया येथील सेवा संस्था मागील दहा वर्षांपासून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाकरिता कार्य करीत आहे. नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याचे कार्यसुद्धा सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. विदर्भातील व्याघ्र क्षेत्राचे एकात्मिक संगोपन आणि  विकास कार्यक्रमांतर्गत सडक अर्जुनी, उत्तर देवरी, गोरेगाव हे वनपरिक्षेत्र लागून आहे. याअंतर्गत जांभळी १ आणि जांभळी २ या बफर झाेन क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी १३ वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत. सेवा संस्थेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जंगलातील जुन्या बंधाऱ्यामधील गाळाचा उपसा केला. तसेच वाहत्या नाल्यावर बंधारा तयार करून पाणी अडविण्यात आले. यामुळे पाणी अडवून वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत झाली. या बंधाऱ्यामुळे आता वन्यप्राण्यांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी मिळण्यास मदत होणार आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, चेतन जसानी, शंशाक लाडेकर, अंकित ठाकूर, कन्हया उदापुरे, दुष्यंत आकरे, अभिजित परिहार हे सहकार्य करीत आहेत, तसेच स्थानिक स्तरावर हवन लटाये, नरेश मेंढे, विजय सोनवने, संतोष कोरे, बादल मटाले यांचे सहकार्य मिळत आहे.

पाणवठ्यांवर संस्थेच्या सदस्यांची नजर

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचून राहावे, पाण्याच्या स्रोतावर त्याचा परिणाम होऊ नये, पाणवठ्यावर विषप्रयोग केला जाऊ नये, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडू नयेत यासाठी सेवा संस्थेचे सदस्य पाणवठ्याच्या क्षेत्रात नजर ठेवून असतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होत आहे.

टँकरने पाणीपुरवठा

उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या आणि जंगलातील पाणवठे कोरडे पडत असल्याने सेवा संस्थेतर्फे स्वखर्चातून टँकरद्वारे पाणवठ्यामध्ये पाण्याची सोय केली जात आहे. यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबविण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य