शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी बंधारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 08:38 IST

Gondia News वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्दे लोकसहभाग १३ गावांत उपक्रमवन्यप्राण्यांची भागविली जात आहे तृष्णा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणवठे व पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अशात वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत असतो, तर बरेचदा शिकारीचे प्रकारसुद्धा घडतात. या प्रकाराला आळा बसावा व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गोंदिया येथील सेवा संस्था मागील दहा वर्षांपासून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाकरिता कार्य करीत आहे. नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याचे कार्यसुद्धा सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. विदर्भातील व्याघ्र क्षेत्राचे एकात्मिक संगोपन आणि  विकास कार्यक्रमांतर्गत सडक अर्जुनी, उत्तर देवरी, गोरेगाव हे वनपरिक्षेत्र लागून आहे. याअंतर्गत जांभळी १ आणि जांभळी २ या बफर झाेन क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी १३ वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत. सेवा संस्थेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जंगलातील जुन्या बंधाऱ्यामधील गाळाचा उपसा केला. तसेच वाहत्या नाल्यावर बंधारा तयार करून पाणी अडविण्यात आले. यामुळे पाणी अडवून वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत झाली. या बंधाऱ्यामुळे आता वन्यप्राण्यांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी मिळण्यास मदत होणार आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, चेतन जसानी, शंशाक लाडेकर, अंकित ठाकूर, कन्हया उदापुरे, दुष्यंत आकरे, अभिजित परिहार हे सहकार्य करीत आहेत, तसेच स्थानिक स्तरावर हवन लटाये, नरेश मेंढे, विजय सोनवने, संतोष कोरे, बादल मटाले यांचे सहकार्य मिळत आहे.

पाणवठ्यांवर संस्थेच्या सदस्यांची नजर

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचून राहावे, पाण्याच्या स्रोतावर त्याचा परिणाम होऊ नये, पाणवठ्यावर विषप्रयोग केला जाऊ नये, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडू नयेत यासाठी सेवा संस्थेचे सदस्य पाणवठ्याच्या क्षेत्रात नजर ठेवून असतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होत आहे.

टँकरने पाणीपुरवठा

उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या आणि जंगलातील पाणवठे कोरडे पडत असल्याने सेवा संस्थेतर्फे स्वखर्चातून टँकरद्वारे पाणवठ्यामध्ये पाण्याची सोय केली जात आहे. यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबविण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य