शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

सव्वा कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: July 29, 2015 01:18 IST

पिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे.

वन्य प्राण्यांचा उपद्रव : रोही व रानडुकरांच्या शिकारीबाबत सुधारित सूचनादेवानंद शहारे  गोंदियापिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी किती पिकांचे नुकसान केले, त्यांच्या हल्लात किती मनुष्य जखमी व कितींचा मृत्यू झाला व या सर्व प्रकरणांत किती नुकसानभरपाई देण्यात आली याची माहिती लोकमतने मिळविली. मागील दोन वर्षांत पीक नुकसान, मनुष्य मृत, जखमी व पशूधन हानी यांच्या नुकसानभरपाईवर वन विभागाने जवळपास सव्वा कोटी रूपये नुकसानभरपाई दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ जून २०१५ च्या नवव्या बैठकीत रोही व रानडुकर प्राण्यांच्या शिकारीबाबत चर्चा करून सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या. पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकरे व रोही यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलण्याबाबत आदेश जाहीर केले आहे. या आदेशान्वये सदर दोन्ही जनावरांची शिकार करण्यासाठी शेतकऱ्यांना परवाना दिला जाईल. परंतु पीक नुकसानीची घटना होताच २४ तासांच्या आत संबंधित वनपालाकडे याची तक्रार करून पावती घेणे आवश्यक आहे. २४ तासांच्या आत परवाना दिला नाही तर अर्जदाराला परवाना दिल्याचे गृहीत धरून शिकारीची मूभा राहणार आहे.याबाबत गोंदिया वनविभागाचे सहायक उपवन संरक्षक जी. उदापुरे यांनी सांगितले की, सदर आदेशात केवळ रोही प्राण्याला समावेश करण्यात आले आहे. शिकार करण्याचा परवाना यापूर्वी दिला जात नव्हता. परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना नुकसान भरपाई पूर्वीपासूनच दिली जात होती. वन विभाग गोंदियातून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१३ ते ३० जून २०१५ पर्यंत एकूण एक कोटी २२ लाख ११ हजार ७५८ रूपयांची नुकसान भरपाई गोंदिया वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे. यात सन २०१३-१४ मध्ये ३९ लाख ५६ हजार ९५० रूपये, सन २०१४-१५ मध्ये ४३ लाख ४६ हजार ६२६ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर सन २०१५ च्या एप्रिल ते जूनपर्यंत केवळ तीन महिन्यांत ३९ लाख आठ हजार १८२ रूपयांनी नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. यात पीक नुकसान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू व जखमी मनुष्य याशिवाय पशूधन हानीचा समावेश आहे. प्राण्यांच्या हल्ल्यात जखमींची ५१ प्रकरणेवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ५१ प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. यात १७ लाख ४३ हजार ४९७ रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. किरकोळ जखमीसाठी १५ हजार रूपये दिले जातत. जखमींचा उपचार शासकीय रूग्णालयात करावे, असे नमूद आहे. परंतु जखमींची स्थिती गंभीर असेल तर त्याला खासगी रूग्णालयात औषधोपचारासाठी नेले जावू शकते. तसेच ३० मार्च २०१३ च्या शासन आदेशानुसार गंभीर जखमी व्यक्तीला एक लाख रूपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. पशुधन हानीची ७७ प्रकरणे दाखलवन विभागाने पशुधन हानीची ७७ प्रकरणे नोंद केली आहेत. या प्रकरणांमध्ये वन विभागाने सात लाख ३२ हजार ९६९ रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ही कार्यवाही वर्षभर सुरूच असते.