शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: July 29, 2015 01:18 IST

पिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे.

वन्य प्राण्यांचा उपद्रव : रोही व रानडुकरांच्या शिकारीबाबत सुधारित सूचनादेवानंद शहारे  गोंदियापिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी किती पिकांचे नुकसान केले, त्यांच्या हल्लात किती मनुष्य जखमी व कितींचा मृत्यू झाला व या सर्व प्रकरणांत किती नुकसानभरपाई देण्यात आली याची माहिती लोकमतने मिळविली. मागील दोन वर्षांत पीक नुकसान, मनुष्य मृत, जखमी व पशूधन हानी यांच्या नुकसानभरपाईवर वन विभागाने जवळपास सव्वा कोटी रूपये नुकसानभरपाई दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ जून २०१५ च्या नवव्या बैठकीत रोही व रानडुकर प्राण्यांच्या शिकारीबाबत चर्चा करून सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या. पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकरे व रोही यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलण्याबाबत आदेश जाहीर केले आहे. या आदेशान्वये सदर दोन्ही जनावरांची शिकार करण्यासाठी शेतकऱ्यांना परवाना दिला जाईल. परंतु पीक नुकसानीची घटना होताच २४ तासांच्या आत संबंधित वनपालाकडे याची तक्रार करून पावती घेणे आवश्यक आहे. २४ तासांच्या आत परवाना दिला नाही तर अर्जदाराला परवाना दिल्याचे गृहीत धरून शिकारीची मूभा राहणार आहे.याबाबत गोंदिया वनविभागाचे सहायक उपवन संरक्षक जी. उदापुरे यांनी सांगितले की, सदर आदेशात केवळ रोही प्राण्याला समावेश करण्यात आले आहे. शिकार करण्याचा परवाना यापूर्वी दिला जात नव्हता. परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना नुकसान भरपाई पूर्वीपासूनच दिली जात होती. वन विभाग गोंदियातून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१३ ते ३० जून २०१५ पर्यंत एकूण एक कोटी २२ लाख ११ हजार ७५८ रूपयांची नुकसान भरपाई गोंदिया वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे. यात सन २०१३-१४ मध्ये ३९ लाख ५६ हजार ९५० रूपये, सन २०१४-१५ मध्ये ४३ लाख ४६ हजार ६२६ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर सन २०१५ च्या एप्रिल ते जूनपर्यंत केवळ तीन महिन्यांत ३९ लाख आठ हजार १८२ रूपयांनी नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. यात पीक नुकसान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू व जखमी मनुष्य याशिवाय पशूधन हानीचा समावेश आहे. प्राण्यांच्या हल्ल्यात जखमींची ५१ प्रकरणेवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ५१ प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. यात १७ लाख ४३ हजार ४९७ रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. किरकोळ जखमीसाठी १५ हजार रूपये दिले जातत. जखमींचा उपचार शासकीय रूग्णालयात करावे, असे नमूद आहे. परंतु जखमींची स्थिती गंभीर असेल तर त्याला खासगी रूग्णालयात औषधोपचारासाठी नेले जावू शकते. तसेच ३० मार्च २०१३ च्या शासन आदेशानुसार गंभीर जखमी व्यक्तीला एक लाख रूपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. पशुधन हानीची ७७ प्रकरणे दाखलवन विभागाने पशुधन हानीची ७७ प्रकरणे नोंद केली आहेत. या प्रकरणांमध्ये वन विभागाने सात लाख ३२ हजार ९६९ रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ही कार्यवाही वर्षभर सुरूच असते.