शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दादासाहेबांना गोंदियातही आदरांजली

By admin | Updated: July 26, 2015 02:02 IST

दलित, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ज्यांचा नावलौकीक होता,..

गोंदिया : दलित, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ज्यांचा नावलौकीक होता, असे महाराष्ट्राचे नेते व दोन राज्यांचे राज्यपालपद भूषविणारे रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनामुळे गोंदियातही हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील दिग्गजांनी आणि दलित चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. अनेकांनी त्यांच्याशी झालेल्या भेटीगाठीं सांगितल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी विदर्भातील दीक्षाभूमीच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची एक शाखा म्हणजे गवई होते, असाही सूर दिग्गज नेत्यांच्या तोंडातून ऐकू आला. महाराष्ट्रातील लोकांची गवई यांच्या माध्यमातून झालेली हानी मोठी आहे. ती पोकळी भरुन काढणे अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया गोंदियात उमटल्या. सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआडरा.सू. गवई अतिशय मनमिळावू वृत्तीचे होते. ते काँग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी चांगली दोस्ती होती. ते कधीच सत्येबाहेर राहिले नाही. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमदारांसाठी एक सोसायटी नोंदणी केली होती. त्यातून आमदारांना फ्लॅट देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यापूर्वी आमदारांची अत्यंत गैरसोय होती. आमदारांना सर्व सोयी देण्यात अंतुले व गवई यांचा फार मोठा वाटा आहे. दलित समाजाला संगठीत करून त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली. बाबासाहेबांची एक शाखा म्हणजे गवई तर दुसरी शाखा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. गवई यांनी दीक्षाभूमिचे खूप मोठे काम केले. महाराष्ट्र सरकारने दीक्षाभूमिला मदतही केली. सोसायटीत एक फ्लॅट घेण्याचा मला गवई यांनी आग्रह केला होता. परंतु मी आणि फुंडकर यांनी नकार दिल्यामुळे भाजपने नकार दिलेल्या गोष्टीवर तुम्ही जावू नका नंतर ते लोक फ्लॅट घेतील आणि तुम्ही तसेच राहाल असे गवई यांनी म्हटले होते. नेमके तेच झाले. आदिवासी, हरिजन व मागासवर्गीयांचा नेता हरपल्याने महाराष्ट्राची हाणी झाली. ते राज्यपाल असताना त्यांनी सत्ताधारी पक्षासोबत कधीच वितुष्ट येऊ दिले नाही. - महादेवराव शिवणकरमाजी वित्तमंत्री दांडग्या अनुभवाचा संसदपटू गमावलाविद्वान आणि दांडगा अनुभव असलेल्या गवई यांच्या निधनामुळे विदर्भाला सर्वात मोठे नुकसान झाले. दीक्षाभूमि निर्माण करण्यात अग्रणी भूमिका बजावणारे सामान्य कार्यकर्त्यांसाठी काम करणारा आंबेडकरी जनतेचा थोर नेता निघून गेला. विधानसभेतील चांगला संसदपटू म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याकडून मलाही अनेक गोष्टी अनुभवता आल्या अशा नेत्यांमुळे मोठी हाणी झाली.-गोपालदास अग्रवालआमदार, गोंदियामागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारा नेतासामाजिक व राजकीय नेतृत्व करणारा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला आहे. यामुळे मागासवर्गीयांची मोठी हाणी झाली.- दिलीप बन्सोडमाजी आमदार, तिरोडाअनुभवी व जाणते कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीतून निघून गेले. त्यांच्या अनुभवासारखा दुसरा कुणी नाही. ही पोकळी भरुन निघणार नाही. नवीन फळीने त्यांचे आंदोलन पुढे नेल्यास त्यांना खरी श्रद्धांजली होईल. -सतीश बन्सोड, रिपाइं पदाधिकारी