शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

विनाकारण चालानवर अंकुश लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:42 IST

वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देटॅक्सीचालक संघटनेची मागणी : आमदार अग्रवाल यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले.संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, बहुतांश काळी-पिवळी व आॅटोचालक सुशिक्षित व बेरोजगार असून कशी बशी पैशांची व्यवस्था करून काळी-पिवळी व आॅटो खरेदी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. असे असताना मात्र, वाहतूक नियंत्रण शाखेने अचानक एकाच मार्गावर २०-२५ वाहनांना विनाकारण चालान करून तंग करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे सर्वच वाहन चालक दहशतीत असून मानसिक तणावात असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे.विशेष म्हणजे, चालान केले जात असल्यामुळे त्यांची आर्थिक समस्या वाढली आहे. करिता वाहतूक नियंत्रण शाखेकडून विनाकारण चालान फाडण्यावर अंकुश लावण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली असून आमदार अग्रवाल यांना निवेदन दिले. यावर आमदार अग्रवाल यांनी, संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे व सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले.निवेदन देताना, जिल्हा काँग्रेस वाहतूक संघाचे अध्यक्ष महेश वाधवानी, उमेश शुक्ला, गुड्डू ठाकुर, विष्णु तिवारी, शेरू मक्कड, रज्जाक खान, सचिन ठाकूर, अश्विन खोब्रागडे उपस्थित होते.अवैध बसेसवर बंदी लावासंघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्ह्यात अवैधरित्या चालत असलेल्या बसेसवर बंदी लावा, जयस्तंभ चौकात थांबून प्रवासी भरणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करा, ज्या बसेसचे परमीट नाही. त्यांना त्वरीत बंद करा, असोसिएशनच्या नियमांविरोधात चालणाऱ्या आॅटोचालकांवर कारवाई करा, बे्रक टेस्ट पासिंगची व्यवस्था गोंदिया जिल्ह्यात करा, जयस्तंभ चौकात सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजतादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना बस चालक व वाहक धक्के मारून दुसऱ्या बसमध्ये जाण्यास सांगतात. तसेच भरधाव वेगात बसेस चालवित असून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. करिता येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालTaxiटॅक्सी