शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक राष्ट्रवाद हीच पक्षाची विचारधारा

By admin | Updated: July 30, 2016 00:16 IST

भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा व अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक व्यवस्था या गोष्टींमुळे

उपेंद्र कोठेकर : भाजपचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान गोंदिया : भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा व अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक व्यवस्था या गोष्टींमुळे पक्षाला ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना अनेक महत्वाच्या राजकीय, सामाजिक चळवळीतून पक्ष पुढे आला आहे. आपलेपणा, सामूहिकतेच्या भावनेतून संघटनेची कार्य करण्याची पद्धत आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद ही पक्षाची विचारधारा असून एकात्म मानवतावाद या तत्वार पक्ष कार्य करतो. शोषित, पीडित, अंतिम घटकाचा विकास हेच आमचे लक्ष असून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी पक्ष कार्य करतो. भारतीय जनता पक्षाचे कोणी मालक नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. ते तीन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाच्या समारोपिय सत्रात मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, डॉ. खुशाल बोपचे, दयाराम कापगते, केशवराव मानकर, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, भेससिंह नागपुरे, विनोद अग्रवाल, अशोक इंगळे, नेतराम कटरे, नगराध्यक्ष कशीश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, संजय नागपुरे, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सीता रहांगडाले, जि.प. सदस्य देवराम वडगाये, छाया दसरे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, संजय कुळकर्णी, सविता इसरका उपस्थित होते. कोठेकर पुढे म्हणाले, भाजप सरकारने देशाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी अनेक योजना आणल्या. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरजूपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन बदलविण्यासाठी कार्य करावे. तर आगामी निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी ‘जे बोलू, ते करू’ या पद्धतीने कार्य करण्यास सांगितले. पालकमंत्री बडोले म्हणाले, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखंड भारत व देश एकसंघ ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. जात, पात, धर्म बाजूला सारून सांस्कृतिक परंपरा घेवून भाजप कार्य करीत आहे. पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या मार्गाने राष्ट्राचा विकास करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून होत असल्याचे सांगितले. सदर प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील २५८ कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण १२ सत्रातून विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पक्षात राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित, सामाजिक हित जोपासण्याची विचारधारा असून राष्ट्रविकासासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष पटले यांनी प्रास्ताविकातून सांगितले. संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्यासह चमूचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात पंकज सोनवाने, ऋषिकांत शाहू, अरविंद तिवारी, दुर्गाप्रसाद ठाकरे, अजित टेंभरे, अजय लौंगानी, विनोद बन्सोडे, धर्मेंद्र डोहरे, अनुराग शुक्ला, योगेंद्र हरिणखेडे, निरज ठाकूर, विनोद मानकर आदींचा समावेश होता. प्रशिक्षणादरम्यान दररोज सकाळी योगाभ्यासचे वर्ग घेण्यात आले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुगम संगीत व भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा महामंत्री भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, मंडळ अध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, डॉ. लक्ष्मण भगत, विजय बिसेन, प्रमोद संगीडवार, परसराम फडे, भाऊराव कठाणे, उमाकांत ढेंगे, सलाम शेख, पप्पू कटरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)