शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

क्रीडांगणाअभावी खेळाडूंची कुचंबना

By admin | Updated: May 2, 2015 01:42 IST

जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींमधील कलागुण विकसित करण्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे...

गोंदिया : जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींमधील कलागुण विकसित करण्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे ती सुसज्ज क्रीडांगणाची. ती उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंची कुचंबना होत आहे, अशी खंत ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक मुकेश बारई यांनी व्यक्त केली. बारई यांना महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेकडून उत्कृष्ट जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार देऊन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते गौरवित करण्यात आले. यानिमित्त जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या वाटचालीवर आणि भविष्यातील विकासावर त्यांनी ‘लोकमत’कडे आपले मनोगत व्यक्त केले. पाच विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेले बारई गेल्या ३५ वर्षांपासून क्रीडा क्षेत्राशी जुळलेले आहेत. व्यवसायाने ते व्यापारी असले तरी त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यामुळेच त्यांना शुक्रवारी शासनाकडून गौरविण्यात आले. विदर्भ बुद्धीबळ असोसिएशनचे चार वर्ष उपाध्यक्ष आणि आता गोंदिया जिल्हा क्रिकेट असोसिएशन व गोंदिया जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे ते सचिव आहेत. याशिवाय पूर्व विदर्भातील राज्यस्तरिय क्रिकेट अंपायरची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले अंपायर आहेत. बुद्धीबळात त्यांनी आॅल इंडिया कलर होल्डर, तर क्रिकेटमध्ये ते विदर्भस्तरिय स्पर्धांमध्ये खेळले आहेत. बुद्धीबळ आणि क्रिकेटमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंना पुढे येण्यासाठी मुकेश बारई यांचे सतत मार्गदर्शन असते. खेळाडूंना चांगला सराव होऊन स्पर्धांची सवय व्हावी यासाठी ते जिल्ह्यात विविध स्पर्धा आयोजित करीत असतात. खेळाडूंना पुढे येण्यासाठी औद्योगिक स्पॉन्सरशिप जिल्ह्यात नाही. त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी लागणारा पैसा प्रत्येकाकडे नसतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रीडांगण आहे. जिल्ह्यात मोकळ्या जागा भरपूर आहेत. पण त्या झुडूपी जंगलात मोडतात. त्यामुळे वन कायद्यानुसार त्यातील एक इंचही जागा मिळत नाही. शासनाने क्रीडा प्रेमींसाठी ही अट शिथिल करून क्रीडांगणासाठी त्या जागा द्याव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता गोंदियात नाही आमगाव, तिरोडा येथेही बारई यांनी प्रशिक्षण सुरू केले आहे. राज्य शासनाकडून तालुका स्तरावर क्रीडांगण उभारले जात आहेत. मात्र ते क्रिकेटसाठी पुरेसे नाहीत. क्रिकेटच्या मैदानाएवढी जागा त्या क्रीडांगणात नसते. ते केवळ देशी खेळांसाठी कामात येईल, असे बारई यांनी सांगितले. विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) मोठी संस्था आहे. मात्र जिल्हास्तरावर त्यांच्याकडून कोणतेही आर्थिक सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शासनानेच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि ग्रामीण खेळाडूंना पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे बारई यांना वाटते. गेल्या पाच वर्षात विदर्भ क्रिकेट टीममध्ये (अंडर १९) चार-पाच खेळाडू खेळत आहेत. बुद्धीबळात अनेक नवीन खेळाडू पुढे येत आहेत. जिल्ह्यात क्रिकेटसारख्या खेळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणे हे आपले ध्येय आहे असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)