शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नियमांना डावलून बाजारात खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  दिवाळी आता एका दिवसावर आली असून बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्या जिल्हा कोरोनामुक्त आहे ही दिलासादायक बाब असली तरी ही गर्दी नियमांना डावलून होत असल्याने मात्र धोका दिसून येतो. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचे बोलले जात असल्याने हलगर्जीपणा करणे उचित नसून तोंडावर मास्क आजही अत्यावश्यक असून नागरिकांनी आता स्वत: काळजी घेणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्हावासीयांना रान मोकळे झाले आहे. हेच कारण आहे की, गणेशोत्सवापासून वाढत चाललेली गर्दी नियमांना डावलून आपल्या मर्जीने वावरत आहे. त्यात नवरात्रोत्सवापासून दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागली व आजघडीला बाजारात पाय ठेवायला जागाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र ही गर्दी नियमांना डावलून होत असून बहुतांश नागरिक तोंडावर मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. त्यात शारीरिक अंतराचे पालन व सॅनिटायझरचा वापर एखाद्या ही दुकानात होताना दिसत नाही हे विशेष. मात्र ही बाब धोकादायक असून वेळीच नियमांचे पालन व तोंडावर मास्क आजही गरजेचा आहे. 

तिसरी लाट न परवडणारी - कोरोनाच्या दोन लाटांमध्ये दोनदा लॉकडाऊन करण्यात आले असून या दोन्ही लाटांमध्ये लाखो लोकांचा जीव गेला असून अवघ्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. त्यात आता पुुन्हा एकदा गर्दी वाढू लागली असून नियमांना धुडकावले जात आहे. अशात तिसरी लाट आल्यास मात्र हे देशाला तसेच देशवासीयांना ही परवडणारे राहणार नाही. यामुळे नियमांचे पालन हेच येणाऱ्या काळासाठी फायद्याचे राहणार आहे. लस घेणे हाच उपाय - देशात झपाट्याने होत असलेल्या लसीकरणामुळे आतापर्यंत तिसरी लाट आलेली नाही. यामुळे लस घेणे हाच एकमात्र उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक लस घेणे टाळत आहेत. त्यांची हीच चूक कोरोनाला पाय पसरण्यासाठी पोषक ठरते. आता कोरोनाला मात देण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार