शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना डावलून बाजारात खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  दिवाळी आता एका दिवसावर आली असून बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्या जिल्हा कोरोनामुक्त आहे ही दिलासादायक बाब असली तरी ही गर्दी नियमांना डावलून होत असल्याने मात्र धोका दिसून येतो. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचे बोलले जात असल्याने हलगर्जीपणा करणे उचित नसून तोंडावर मास्क आजही अत्यावश्यक असून नागरिकांनी आता स्वत: काळजी घेणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्हावासीयांना रान मोकळे झाले आहे. हेच कारण आहे की, गणेशोत्सवापासून वाढत चाललेली गर्दी नियमांना डावलून आपल्या मर्जीने वावरत आहे. त्यात नवरात्रोत्सवापासून दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागली व आजघडीला बाजारात पाय ठेवायला जागाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र ही गर्दी नियमांना डावलून होत असून बहुतांश नागरिक तोंडावर मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. त्यात शारीरिक अंतराचे पालन व सॅनिटायझरचा वापर एखाद्या ही दुकानात होताना दिसत नाही हे विशेष. मात्र ही बाब धोकादायक असून वेळीच नियमांचे पालन व तोंडावर मास्क आजही गरजेचा आहे. 

तिसरी लाट न परवडणारी - कोरोनाच्या दोन लाटांमध्ये दोनदा लॉकडाऊन करण्यात आले असून या दोन्ही लाटांमध्ये लाखो लोकांचा जीव गेला असून अवघ्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. त्यात आता पुुन्हा एकदा गर्दी वाढू लागली असून नियमांना धुडकावले जात आहे. अशात तिसरी लाट आल्यास मात्र हे देशाला तसेच देशवासीयांना ही परवडणारे राहणार नाही. यामुळे नियमांचे पालन हेच येणाऱ्या काळासाठी फायद्याचे राहणार आहे. लस घेणे हाच उपाय - देशात झपाट्याने होत असलेल्या लसीकरणामुळे आतापर्यंत तिसरी लाट आलेली नाही. यामुळे लस घेणे हाच एकमात्र उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक लस घेणे टाळत आहेत. त्यांची हीच चूक कोरोनाला पाय पसरण्यासाठी पोषक ठरते. आता कोरोनाला मात देण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार