शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मग्रारोहयोच्या कामांचे ५२ कोटी अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 21:27 IST

सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याचे अद्याप देण्यात आले नाही.

ठळक मुद्देचार वर्षांचा पैसा थकीत : ४९ हजार दिवसांची मजुरी अडली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उत्थानाची कामे करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या मजूरांना त्यांच्या कामाचे पैसे देण्यात आले नाही. तसेच जी कामे करण्यात आली त्या कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे चार वर्षापासून पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे ज्यांनी काम केले त्यांचे पैसे अडून पडले आहेत. मजुरीच्या एक कोटी १२ लाख रूपयांसह साहित्याचे घेऊन गोंदियाचे ५२ कोटी रूपये अडले आहेत.बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे तसेच ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून शासनाने महाराष्ट्र शासनाच्या आमुलाग्र योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेला केंद्रातून राबविणे सुरू केले. मात्र मागील चार वर्षांपासून मजूरी व काम करण्यासाठी कंत्राटदारांना आणलेल्या साहित्याचेही पैसे चार वर्षांपासून देण्यात आले नाही. गोंदिया जिल्हा वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील पैसे शासनाने दिले. परंतु गोंदिया जिल्ह्याचे पैसे मागील चार वर्षापासून अडून आहेत.सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याचे अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे मे, जून व जुलै या तीन महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही.सन २०१६-१७ या वर्षात मजुरीचे ३७ लाख ४९ हजार रूपये, साहित्याचे ३२ लाख ८६ हजार रूपये, सन २०१७-१८ या वर्षात मजुरीचे २९ लाख ९६ हजार रूपये साहित्याचे १४ कोटी १५ लाख १६ हजार रूपये, सन २०१८-१९ या वर्षात मजुरीचे २२ लाख ७३ हजार, साहित्याचे २२ कोटी ८० लाख ७६ हजार रूपये तर सन २०१९-२० या वर्षात मजुरीचे २२ लाख ४२ हजार, साहित्याचे १३ कोटी ३२ लाख ६१ हजार रूपये असे ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये अडून पडले आहेत.रोहयोत गोंदिया माघारलादरवर्षी रोहयोत गोंदिया जिल्हा देशात अग्रस्थानी राहायचा परंतु आता नियोजन शुन्य कारभारामुळे गोंदिया जिल्हा माघारला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याचे चार वर्षांपासून पैसे अडून पडले आहेत. साहित्यावर कंत्राटदारांनी जे पैसे खर्च केले ते देण्याची मागणी काही कंत्राटदारांनी केली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना