शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राने पीक लागवडचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचे प्राबल्य असून येथील शेतकरी धानाचेच जास्त प्रमाणात उत्पादन घेतो. त्यातही खरिपात ९५ टक्के धान पिक घेतले जात असून त्यात हलक्या धानाचे प्रमाण जास्त असते. खरिपातील धान पीक काढल्यानंतर सिंचनाची सोय असल्यावर शेतकरी रब्बीची तयारी करतो. यासाठी धानाचे खूंट काढण्यासाठी नांगरणीपासून जमिनीच्या मशागतीची पूर्ण तयारी करावी लागते. मात्र नांगरणी केल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होतो व जमिन कोरडी पडते.

ठळक मुद्देप्रायोगीक तत्वावर केला प्रयोग : गोंदिया व तिरोडा तालुक्यांची निवड

 कपिल केकत    लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया : खरिपातील धानाची कापणी झाल्यानंतर जमिनीत कायम असलेल्या ओलाव्याचा फायदा व्हावा या उद्देशातून रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर केला जात आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग केला जात असून यासाठी गोंदिया व तिरोडा ताक्क्याची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातून शेतकऱ्याला चांगले उत्पादन घेता येणार असतानाच जमिनीच्या मशागतीसाठी येणारा खर्च सुद्धा वाचणार आहे. गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचे प्राबल्य असून येथील शेतकरी धानाचेच जास्त प्रमाणात उत्पादन घेतो. त्यातही खरिपात ९५ टक्के धान पिक घेतले जात असून त्यात हलक्या धानाचे प्रमाण जास्त असते. खरिपातील धान पीक काढल्यानंतर सिंचनाची सोय असल्यावर शेतकरी रब्बीची तयारी करतो. यासाठी धानाचे खूंट काढण्यासाठी नांगरणीपासून जमिनीच्या मशागतीची पूर्ण तयारी करावी लागते. मात्र नांगरणी केल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होतो व जमिन कोरडी पडते. अशात रब्बीसाठी सिंचनाची सोय असल्यास ठीक आहे मात्र नसल्यास शेतकऱ्याला पाण्याची सोय करावी लागते. अशात मात्र झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर शेतकऱ्यांसाठी चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. यात, खरिपातील धान पिकाची कटाई झाल्यानंतर नांगरणी न करता त्याच जमिनीत लगेच झिरो टील ड्रिल यंत्राने पेरणी केल्यास जमिनीतील ओलाव्याने रब्बी पिकांना लाभ होते व चांगले उत्पादन येते. विशेष म्हणजे, धानाचे खूंट जमिनीत राहत असल्याने ते जमिनीतच कुजतात व त्यापासून उच्चप्रतीचे खत तयार होते व ते जमिनीसाठी अत्यंत पोषक आहेत. नेमकी हीच बाब हेरून कृषी विभागाने जिल्ह्यात झिरो टील ड्रिल यंत्राच्या वापराचा प्रयोग हाती घेतला. या यंत्राद्वारे खरिपातील धानाची कापणी झाल्यानंतर लगेच रब्बी पिकांची यंत्राद्वारे करण्यात आली आहे. यासाठी गोंदिया व तिरोडा तालुक्याची निवड करण्यात आली. 

असा होणार यंत्राचा फायदा या यंत्राचा वापर केल्याने खरिपातील जमिनीचा ओलावा कायम राहत असून त्याचा फायदा रब्बी पिकांना मिळतो. धानाचे खूंट जमिनीतच राहत असल्याने जमिनीत सेंद्रीय खत व सेंद्रीय पदार्थांची निर्मिती होते व ते जमिनीसाठी अत्यंत पोषक असतात. परिणामी उत्पादन चांगले मिळते. विशेष म्हमजे, झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर थेट धान खरिपातील धान कापणी नंतर केला जात असल्याने यासाठी शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करावी लागत व तेवढा खर्च वाचतो. विशेष म्हणजे, धानाचे खूंट जमिनीत कुजून खत व ऑर्गेनिक कार्बन तयार होत असून हे अत्यंत महत्वाचे घटक आहे. सुमारे ५०० एकरात केला प्रयोग झिरो टील ड्रिल यंत्राद्वारे लागवडीचा प्रयोग करण्यासाठी गोंदिया व तिरोडा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कृषी औजार निर्मात्यांकडून ३ यंत्र प्रयोगासाठी घेण्यात आले असून याद्वारे सुमारे ५०० एकरात यंदा करडई, मोहरी व हरभराची लागवड करण्यात आली आहे. तयार जमिनीतच यंत्राद्वारे रब्बी पिकांची लागवड करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा जमिन मशागतीचा खर्च वाचला आहे. 

शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे झिरो टील ड्रिल यंत्राचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदाचा आहे. एकतर जमिन तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाचत असून शिवाय धानाची खूंट जमिनीत कुजून जमिनीला सेंद्रीय खत मिळते. यातून चांगल्या उत्पादनासाठी फायदा होतो. - गणेश घोरपडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती