शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

पीक विम्यासाठी संयुक्त पंचनामे ग्राह्य धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसानीचा संपूर्ण अहवाल पोहचला नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब : आत्तापर्यंत ३३१५ पंचनामे, परतीच्या पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले. पीक विमा कंपनीने सुध्दा नुकसानीची सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.मात्र पीक विमा कंपनीकडे अपुरी आहे.परिणामी पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे केलेले नुकसानीचे पंचनामे पीक विमा कंपनीने ग्राह्य धरणाचे निर्देश शासनाने दिले आहे.त्यामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास जरी विलंब झाला असेल तरी त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील ७० हजार ३० शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत एकूण ३९ हजार १२९ हेक्टरचा पीक विमा काढला. मात्र यंदा पीक परिस्थिती चांगली असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरले.परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घ्यास हिरावला गेला आहे. पावसामुळे १० हजार हेक्टरमधील धानपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. तसा अहवाल देखील कृषी आणि महसूल विभागाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले असल्यास त्यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीकडे अर्ज अनिवार्य होते. अन्यथा ते शेतकरी मदतीस अपात्र ठरणार होते.अशी अट विमा कंपनीने लागू केली होती.मात्र जिल्ह्यातील ७० हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांपैकी २६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर इतर शेतकऱ्यांनी अर्ज केले नव्हते.त्यामुळे ते पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर पीक विमा कंपनीकडे मनुष्यबळ कमी असल्याने आत्तापर्यंत केवळ ३३१५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र शासनाने यावर तोडगा काढत कृषी आणि महसूल विभागाने पिकांचे नुकसानीचे केलेले पंचनामे विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहे.त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला असून अर्ज न केलेले पीक विमाधारक शेतकरी सुध्दा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.मदतीसाठी करावी लागणार प्रतीक्षापीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसानीचा संपूर्ण अहवाल पोहचला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती