शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीक विमा कंपनीचा अजब जावईशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:34 IST

जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर होते. जिल्हा परिषद कृषी विभागाने सुध्दा याला दुजोरा दिला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यात केवळ ६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर : हजारो शेतकऱ्यांना फटका

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर होते. जिल्हा परिषद कृषी विभागाने सुध्दा याला दुजोरा दिला होता. मात्र पीक विमा कंपन्यांनी जिल्ह्यात केवळ ५ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र नापेर असल्याचे दाखवित तेवढ्याच क्षेत्रासाठी २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. विमा कंपनीच्या या अजबजावईशोधामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात खरीपात एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. कृषी विभागाने मागील हंगामात ऐवढयाच हेक्टरवर लागवडीचे नियोजन केले होते. मात्र खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस दीड महिना लांबला. सरासरीच्या तुलनेत ५४ टक्के पाऊस झाला. त्यामुळे ७० हजार हेक्टर धानाची लागवडच झाली नाही. परिणामी तेवढे क्षेत्र नापेर राहिले. जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर कृषी विभागातर्फे नापेर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड झाली नसल्याचा अहवाल जि.प.कृषी विभागाने सभागृहात सादर केला होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सुद्धा त्याला दुजोरा देत शासनाकडे अहवाल पाठविल्याचे सांगितले होते.मात्र पीक विमा कंपनीने नुकतेच नापेर क्षेत्रासाठी नुकसान भरपाई जाहीर केली. त्यामध्ये केवळ तिरोडा तालुक्यातील परसवाडा, ठाणेगाव, मुंडीकोटा या क्षेत्रातील ५ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र नापेर असल्याचे दाखविले आहे. तेवढ्याच क्षेत्रातील ३ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही मदत देताना केवळ ३ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा काढल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ७० हजारावर शेतकºयांनी पीक विमा काढला होता. याला जिल्हा व राष्टÑीयकृत बँकानी सुध्दा दुजोरा दिला होता.मात्र पीक विमा कंपनीने स्वत:चे नियम लावत केवळ ३ हजार शेतकºयांना नुकसान भरपाई देत हजारो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. दरम्यान या प्रकारामुळे शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.कमी उत्पादकतेच्या निकषावर मदतकमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाचा फटका खरीपातील पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली. ते यंदा घटलेल्या धान खरेदीवरुन देखील स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग आणि पीक कंपन्याच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसल्याने रोष व्याप्त आहे. यामुळे कृषी विभागाने आता बचावात्मक पावित्रा घेत शेतकºयांना कमी उत्पादकतेच्या निकषावर नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.कृषी विभागाची बघ्याची भूमिकाजिल्ह्यात पावसाअभावी ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला होता. तसेच पीक विमा कंपन्यांना सुध्दा याची माहिती दिली होती. आता पीक विमा कंपनीने केवळ ५ हजार ६३१ हेक्टरमधील क्षेत्र नापेर असल्याचे असल्याचे दाखविल्यानंतर कृषी विभागाने यावर काहीच कारवाई केली नसल्याची माहिती आहे.प्रसिद्धीत आघाडीवर मदतीत मागेखरीप हंगामादरम्यान शेतकऱ्यांनी पीक विमा काढवा यासाठी कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शेतकºयांच्या बांधावर जावून पीक विमा काढण्याचा सल्ला कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी देत होते. आता शेतकºयांना फटका बसल्यानंतर यावर काहीही बोलण्यास कृषी विभागाचे अधिकारी तयार नसल्याचे चित्र आहे.