शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पीक विमा कंपनीचा अजब जावईशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:34 IST

जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर होते. जिल्हा परिषद कृषी विभागाने सुध्दा याला दुजोरा दिला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यात केवळ ६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर : हजारो शेतकऱ्यांना फटका

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर होते. जिल्हा परिषद कृषी विभागाने सुध्दा याला दुजोरा दिला होता. मात्र पीक विमा कंपन्यांनी जिल्ह्यात केवळ ५ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र नापेर असल्याचे दाखवित तेवढ्याच क्षेत्रासाठी २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. विमा कंपनीच्या या अजबजावईशोधामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात खरीपात एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. कृषी विभागाने मागील हंगामात ऐवढयाच हेक्टरवर लागवडीचे नियोजन केले होते. मात्र खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस दीड महिना लांबला. सरासरीच्या तुलनेत ५४ टक्के पाऊस झाला. त्यामुळे ७० हजार हेक्टर धानाची लागवडच झाली नाही. परिणामी तेवढे क्षेत्र नापेर राहिले. जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर कृषी विभागातर्फे नापेर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड झाली नसल्याचा अहवाल जि.प.कृषी विभागाने सभागृहात सादर केला होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सुद्धा त्याला दुजोरा देत शासनाकडे अहवाल पाठविल्याचे सांगितले होते.मात्र पीक विमा कंपनीने नुकतेच नापेर क्षेत्रासाठी नुकसान भरपाई जाहीर केली. त्यामध्ये केवळ तिरोडा तालुक्यातील परसवाडा, ठाणेगाव, मुंडीकोटा या क्षेत्रातील ५ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र नापेर असल्याचे दाखविले आहे. तेवढ्याच क्षेत्रातील ३ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही मदत देताना केवळ ३ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा काढल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ७० हजारावर शेतकºयांनी पीक विमा काढला होता. याला जिल्हा व राष्टÑीयकृत बँकानी सुध्दा दुजोरा दिला होता.मात्र पीक विमा कंपनीने स्वत:चे नियम लावत केवळ ३ हजार शेतकºयांना नुकसान भरपाई देत हजारो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. दरम्यान या प्रकारामुळे शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.कमी उत्पादकतेच्या निकषावर मदतकमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाचा फटका खरीपातील पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली. ते यंदा घटलेल्या धान खरेदीवरुन देखील स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग आणि पीक कंपन्याच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसल्याने रोष व्याप्त आहे. यामुळे कृषी विभागाने आता बचावात्मक पावित्रा घेत शेतकºयांना कमी उत्पादकतेच्या निकषावर नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.कृषी विभागाची बघ्याची भूमिकाजिल्ह्यात पावसाअभावी ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला होता. तसेच पीक विमा कंपन्यांना सुध्दा याची माहिती दिली होती. आता पीक विमा कंपनीने केवळ ५ हजार ६३१ हेक्टरमधील क्षेत्र नापेर असल्याचे असल्याचे दाखविल्यानंतर कृषी विभागाने यावर काहीच कारवाई केली नसल्याची माहिती आहे.प्रसिद्धीत आघाडीवर मदतीत मागेखरीप हंगामादरम्यान शेतकऱ्यांनी पीक विमा काढवा यासाठी कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शेतकºयांच्या बांधावर जावून पीक विमा काढण्याचा सल्ला कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी देत होते. आता शेतकºयांना फटका बसल्यानंतर यावर काहीही बोलण्यास कृषी विभागाचे अधिकारी तयार नसल्याचे चित्र आहे.