शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

समुपदेशन केंद्राने वाचविले ५६८ संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:44 IST

आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे.

ठळक मुद्देघटस्फोट टळला : ३८ प्रकरणात सुरू आहेत प्रयत्न

नितीन आगाशे।आॅनलाईन लोकमततिरोडा : आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे. विशेष म्हणजे, आणखीही ३८ प्रकरणांत समुपदेश केंद्राचे कार्य सुरू आहे.संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच. काही ना काही कारणांतून पती-पत्नी मध्ये खटके उडून त्याचे पर्यावसन कोर्टकचेरीपासून घटस्फोटापर्यंत जावून दोघांचा संसार उद्ध्वस्त होतो. मात्र याचा परिणाम मुले व दोन्ही कुटुंबांना भोगावा लागतो. ही बाब लक्षात घेत राज्य शासनाने आयुक्तालय पुणे अंतर्गत महिला समुपदेशन केंद्र सुरू केले. हे समुपदेशन केंद्र दाम्पत्य जीवनातील विभक्त होण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या पती-पत्नीच्या निर्णयांत परिवर्तन घडवून आणण्याचे काम करते.दोघांची समजूत घालून टोकावर गेलेल्या घटस्फोटाच्या निर्णयापासून दोघांना मागे आणून नव्याने संसार थाटण्याची ज्योत प्रज्वलीत करते.विशेष म्हणजे, समुपदेशनाचा हा प्रयोग यशस्वी ठरु लागल्याचा प्रत्यय तिरोडा तालुक्यात आला आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये सुरु झालेल्या येथील महिला समूपदेशन केंद्राने डिसेंबर १७ पर्यंत दाखल ६०६ प्रकरणांपैकी ५६८ प्रकरणांत परस्पर समुपदेशनातून घटस्फोटाचा निर्णय बाद करून पती-पत्नीला पुन्हा जवळ आणण्यात यश प्राप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण चार महिला समुपदेशन केंद्र असून यात गोंदिया, तिरोडा, देवरी व अर्जुनी-मोरगाव पोलीस उपविभागांचा समावेश आहे. येथील समुपदेशन केंद्रांतर्गत दवनीवाडा, गंगाझरी व तिरोडा पोलीस स्टेशनचे क्षेत्र येते.मागील पाच वर्षात येथील समुपदेशन केंद्रात एकूण ६०६ प्रकरणांत कलह विकोपाला गेल्याची प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी ५६८ प्रकरणांत समुपदेशनातून त्यांचे संसार वाचविण्यात आले. अजून ३८ प्रकरणांत सामंजस्यातून विवाद सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुदेशक दिनेश कावडकर व सोनम पारधी यांचे अथक प्रयत्न मोडकळीस आलेले दाम्पत्य जीवन पुन्हा फुलविण्यात यशस्वी ठरत आहेत.