शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशन केंद्राने वाचविले ५६८ संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:44 IST

आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे.

ठळक मुद्देघटस्फोट टळला : ३८ प्रकरणात सुरू आहेत प्रयत्न

नितीन आगाशे।आॅनलाईन लोकमततिरोडा : आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे. विशेष म्हणजे, आणखीही ३८ प्रकरणांत समुपदेश केंद्राचे कार्य सुरू आहे.संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच. काही ना काही कारणांतून पती-पत्नी मध्ये खटके उडून त्याचे पर्यावसन कोर्टकचेरीपासून घटस्फोटापर्यंत जावून दोघांचा संसार उद्ध्वस्त होतो. मात्र याचा परिणाम मुले व दोन्ही कुटुंबांना भोगावा लागतो. ही बाब लक्षात घेत राज्य शासनाने आयुक्तालय पुणे अंतर्गत महिला समुपदेशन केंद्र सुरू केले. हे समुपदेशन केंद्र दाम्पत्य जीवनातील विभक्त होण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या पती-पत्नीच्या निर्णयांत परिवर्तन घडवून आणण्याचे काम करते.दोघांची समजूत घालून टोकावर गेलेल्या घटस्फोटाच्या निर्णयापासून दोघांना मागे आणून नव्याने संसार थाटण्याची ज्योत प्रज्वलीत करते.विशेष म्हणजे, समुपदेशनाचा हा प्रयोग यशस्वी ठरु लागल्याचा प्रत्यय तिरोडा तालुक्यात आला आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये सुरु झालेल्या येथील महिला समूपदेशन केंद्राने डिसेंबर १७ पर्यंत दाखल ६०६ प्रकरणांपैकी ५६८ प्रकरणांत परस्पर समुपदेशनातून घटस्फोटाचा निर्णय बाद करून पती-पत्नीला पुन्हा जवळ आणण्यात यश प्राप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण चार महिला समुपदेशन केंद्र असून यात गोंदिया, तिरोडा, देवरी व अर्जुनी-मोरगाव पोलीस उपविभागांचा समावेश आहे. येथील समुपदेशन केंद्रांतर्गत दवनीवाडा, गंगाझरी व तिरोडा पोलीस स्टेशनचे क्षेत्र येते.मागील पाच वर्षात येथील समुपदेशन केंद्रात एकूण ६०६ प्रकरणांत कलह विकोपाला गेल्याची प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी ५६८ प्रकरणांत समुपदेशनातून त्यांचे संसार वाचविण्यात आले. अजून ३८ प्रकरणांत सामंजस्यातून विवाद सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुदेशक दिनेश कावडकर व सोनम पारधी यांचे अथक प्रयत्न मोडकळीस आलेले दाम्पत्य जीवन पुन्हा फुलविण्यात यशस्वी ठरत आहेत.