शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कापूस परवडेना, सोयाबीनला भाव

By admin | Updated: November 6, 2014 22:59 IST

यंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी

शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनचे उत्पन्न नसल्याने दरवाढ तोट्याचीचविजय माहुरे - घोराडयंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी असल्याने त्याचा उपायोग नसल्यागत आहे. कापूस शेतातून घरी येणे सुरू झाल्याने दर वाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. बाजारात कापूस ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकाचा लागत आहे. सीतदहीच्या उच्च प्रतिच्या कापसाला हा दर मिळत असल्याने शेवटी येणाऱ्या फरतडीचा दर काय असणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना आतापासून भेडसावत आहे. दुबार तिबार पेरणीने विलंब झाल्याने कापूस येण्यास विलंब झाला. त्यातच मर रोग व लाल्याच्या थैमानामुळे उत्पन्नात घट येणार हे निश्चित असताना खर्चापेक्षा कमी भावाने कापूस विकण्याची वेळ कापूस उत्पादकावर आली आहे. सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांच्यावर दर मिळत आहे. मात्र सोयाबीनचे उत्पन्न निघण्याचे संकेत नाही. शेतकऱ्यांनी एकरी एक क्विंटलचा उतारा मिळत आहे. सरासरी एकरी चार क्विंटलची उतारी येत आहे. यामुळे मिळणारा दर सोयाबीनकरिताही अत्यल्प ठरत आहे. उत्पन्न नसल्याने या वाढीव दराचा विशेष लाभ घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही. अस्माणी व सुलतानी संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना सतत तीन वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत आहे. हे दृष्टचक्र कधी थांबणार याच प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले नाही तर शेती हा व्यवसाय तोट्याचाच ठरत राहणार आहे. कृषी प्रधान देशात शेतकऱ्याची व्यथा कायमच राहणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नापिकी झाली असतांना महसूल विभागाची आणेवारी ५० पैशांच्यावर कशी राहते हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यातूनही काहीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. पहिल्या दिवशी ३ हजार ९५० रुपयांचा दर देवळी येथील श्रीकृष्ण जीनिंग फॅक्टरीत भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी ३ हजार ९५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. खरेदीचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप तायवाडे, मोहनलाल अग्रवाल व सीसीआयचे केंद्रप्रमुख पन्नालाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम शालीक येंडे व चेतन येंडे या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा नारळ-पान देवून सत्कार करून कापूस गाड्यांचे पूजन करण्यात आले. सीसीआयच्या खरेदीला सुरुवात होत असल्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या. ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कापसाचे भाव घुटमळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यावेळी विनोद धिया छितरमल वर्मा, पप्पू टावरी, महेश अग्रवाल व माणक सुराणा यांची उपस्थिती होती.