शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महामंडळ करणार 4 लाख 29 हजार क्विंटल धानाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. हमीभावाने धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचा कलसुद्धा या केंद्रावर अधिक असतो. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी  दराने धान खरेदी करता येत नाही. तर यावर्षी रब्बी धानाचे बंपर पीक झाले आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाला केवळ २ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात धान खरेदीसाठी शासनाने सुरुवातीला २ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली होती. मात्र ही मर्यादा फारच कमी असल्याने यावर शेतकऱ्यांची ओरड सुरू होती. यानंतर शासनाने आदिवासी विकास महामंडळाला २ लाख २९ क्विंटल धान खरेदीच्या मर्यादेत वाढ करून दिली आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाला ४ लाख २९ हजार क्विंटल धान खरेदी करता येणार असल्याने शेतकऱ्यांनासुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. हमीभावाने धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचा कलसुद्धा या केंद्रावर अधिक असतो. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी  दराने धान खरेदी करता येत नाही. तर यावर्षी रब्बी धानाचे बंपर पीक झाले आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाला केवळ २ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. परिणामी शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विकण्याची वेळ आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाप्रती संतापाचे वातावरण होते. दरम्यान शासनाने आदिवासी विकास महामंडळाला धान खरेदीच्या मर्यादेत वाढ करून दिली आहे. यासंबंधीचे पत्र ६ जून काढले आहे. त्यानुसार आता आदिवासी विकास महामंडळ रब्बी हंगामाचे ४ लाख २९ हजार क्विंटल धान खरेदी करणार आहे.

३८ केंद्रावरून धान खरेदी - रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५५२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ३८ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाणार आहे. यापैकी बरेच केंद्र सुरू झाले असून या केंद्रावरून धान खरेदी देखील सुरू झाली आहे. 

यंदा जिल्ह्यात रब्बीचे विक्रमी उत्पादन झाले; मात्र त्या तुलनेत केंद्र शासनाने धान खरेदीची मर्यादा फारच कमी ठरवून दिली होती. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. याचीच दखल घेत शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.- सहषराम कोरोटे, आमदार

३० जून खरेदीची शेवटची तारीखआदिवासी विकास महामंडळाला शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून देताना ३० जून ही धान खरेदीची शेवटची तारीख राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर पोहोचत धानाची विक्री करावी लागणार आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड