जमीन झाली ओसाड : कृषी विभागाने हस्तांतरित केलेली जमीनआमगाव : आमगाव तालुक्यातील राज्य शासनाअंतर्गत येणाऱ्या वनविकास महामंडळाने वनविकासाकरिता हस्तांतरीत केलेली कृषी विभागाची जमीन वन लागवडीअभावी ओसाड झाली आहे. राज्य शासनाने राज्यात वनविकासाकरिता शासन स्तरावर अनेक उपयोगी योजना कार्यान्वीत केल्या आहेत. वनांचे संवर्धन व्हावे यासाठी संशोधनात्मक पध्दतीने यावर काम सुरू केले. परंतु सदर विभागातील कार्यपध्दतीने जमीन उपलब्ध असूनही वृक्ष लागवडीअभावी परिसर ओसाड पडला आहे.आमगाव तालुकास्थळावर कृषी विभाग राज्य शासनाची अधिग्रहित जमीन आहे. या जागेवर कृषी विभागाने प्रारंभीच वृक्ष लागवड व कृषी संशोधनात्मक शेतीचा कार्य यशस्वीपणे राबविले. यात राज्य शासनाने कृषी विभागाची २६.३२ हेक्टर जमीन १९७६ ला वनविकास महामंडळाला देण्यात आली. त्यापैकी शासनाने महसूल व पाटबंधारे विभागाला काही जागा हस्तांतरीत केली. उर्वरीत जागेवर वनविकास महामंडळाने वनवृक्ष व बिजरोपणासाठी राखीव ठेवण्यात आली. सुरूवातीला या विभागाने शासनाची अनेक उपाययोजना अंमलात आणली. परंतु कालांतराने वनविकास महामंडळाने या जमिनीवर वृक्ष लागवड व संवर्धनाला पाठ दाखविली. त्यामुळे कोट्यावधीची वनसंपदान असलेली जागा वनविकास महामंडळाच्या दिरंगाईमुळे ओसाड झाली आहे. आमगाव तालुका स्थळावर वनविकास महामंडळ विभागाने गोंदिया वनप्रकल्प विभागाअंतर्गत वन रोपवाटिकेचे काम प्रारंभ केले आहे. परंतु हे काम फक्त विभागाच्या बोर्डावर रेखाटलेले आहे. वास्तविक या विभागातील कार्यालयांना कुलूप बंद करण्यात आले असून फिरत्या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. वनवृक्षाची अवैध वृक्षतोड व चोरीला आळा घालण्यासाठी हे पथक कार्य करीत आहे. सदर विभागातील कार्यपध्दतीने जमीन उपलब्ध असूनही वृक्ष लागवड अभावी परिसर ओसाड करून टाकले. (शहर प्रतिनिधी)
वनविकासात महामंडळ नापास
By admin | Updated: July 10, 2014 23:38 IST