शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ५६ बालके झाली अनाथ (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५६ बालके अशी आढळलीत की त्यांच्या आई-वडिलांपैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला, तर ३ बालकांचे आई-वडील दोघेही मरण पावले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६७५ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ वर्षांखालील ५६ बालके अशी आढळली की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेले. जिल्हाभरातील माहिती घेणे सुरू असल्याने हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दल गठन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत गावस्तरापासून ही माहिती संकलित केली जात आहे.

...........................

मिळेल बालसंगोपन योजनेचा लाभ

-आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १८ वर्षांखालील बालकाला बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ५६७ बालकांना ४२५ रुपये दरमहा ही मदत देण्यात येते.

-शासनाने या संगोपन योजनेच्या लाभात वाढ केली असून, ११०० रुपयांप्रमाणे मदत एप्रिल महिन्यापासून देण्याचे शासनाने ठरविले; परंतु ही मदत अद्याप देण्यात आली नाही.

- जुन्याच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना संचारबंदीच्या काळात लाभ देण्यात आला नाही. शासनाने विविध घटकांची काळजी घेऊन ५०० कोटींहून अधिकचे पॅकेज ऑटोचालक, फेरीवाले, बांधकाम मजुरांना वाटले; परंतु बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानच दिले नाही. या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुला-मुलींचा शोध ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविकांमार्फत घेतला जात आहे. कोविड मृताचे नाव, वय, पत्ता, पालक संपर्क पत्ता व पूरक माहिती संकलित केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर परिविक्षा अधिकारी (गृह) चौकशी करतात. त्यानंतर बालसंगोपन योजना किंवा बालगृहातून लाभ देण्याबाबत निर्देश असल्याचे परिविक्षा अधिकारी गोबाळे यांनी सांगितले.

...............................................

कोरोनाने आई किंवा वडील हिरावलेल्यांची संख्या ५६

मुले--२५

मुली-- ३१

..............................

कोट

महाराष्ट्र शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयानुसार विविध विभागांकडून ग्रामपातळीवर एक पालक, दोन्ही पालक गमावल्याची माहिती घेतली जात आहे. शहरी भागात नगर परिषद व आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. अशा बालकांचे बालसंगोपन योजना, बालगृहाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन केले जाणार आहे. एकही मूल उघड्यावर राहणार नाही. दर आठवड्याला संकलित होणारी अद्ययावत माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविली जात आहे.

- तुषार पवनीकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी, गोंदिया.