शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

कोरोनामुळे ५६ बालके झाली अनाथ (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५६ बालके अशी आढळलीत की त्यांच्या आई-वडिलांपैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला, तर ३ बालकांचे आई-वडील दोघेही मरण पावले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६७५ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ वर्षांखालील ५६ बालके अशी आढळली की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेले. जिल्हाभरातील माहिती घेणे सुरू असल्याने हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दल गठन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत गावस्तरापासून ही माहिती संकलित केली जात आहे.

...........................

मिळेल बालसंगोपन योजनेचा लाभ

-आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १८ वर्षांखालील बालकाला बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ५६७ बालकांना ४२५ रुपये दरमहा ही मदत देण्यात येते.

-शासनाने या संगोपन योजनेच्या लाभात वाढ केली असून, ११०० रुपयांप्रमाणे मदत एप्रिल महिन्यापासून देण्याचे शासनाने ठरविले; परंतु ही मदत अद्याप देण्यात आली नाही.

- जुन्याच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना संचारबंदीच्या काळात लाभ देण्यात आला नाही. शासनाने विविध घटकांची काळजी घेऊन ५०० कोटींहून अधिकचे पॅकेज ऑटोचालक, फेरीवाले, बांधकाम मजुरांना वाटले; परंतु बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानच दिले नाही. या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुला-मुलींचा शोध ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविकांमार्फत घेतला जात आहे. कोविड मृताचे नाव, वय, पत्ता, पालक संपर्क पत्ता व पूरक माहिती संकलित केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर परिविक्षा अधिकारी (गृह) चौकशी करतात. त्यानंतर बालसंगोपन योजना किंवा बालगृहातून लाभ देण्याबाबत निर्देश असल्याचे परिविक्षा अधिकारी गोबाळे यांनी सांगितले.

...............................................

कोरोनाने आई किंवा वडील हिरावलेल्यांची संख्या ५६

मुले--२५

मुली-- ३१

..............................

कोट

महाराष्ट्र शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयानुसार विविध विभागांकडून ग्रामपातळीवर एक पालक, दोन्ही पालक गमावल्याची माहिती घेतली जात आहे. शहरी भागात नगर परिषद व आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. अशा बालकांचे बालसंगोपन योजना, बालगृहाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन केले जाणार आहे. एकही मूल उघड्यावर राहणार नाही. दर आठवड्याला संकलित होणारी अद्ययावत माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविली जात आहे.

- तुषार पवनीकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी, गोंदिया.