शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ५६ बालके झाली अनाथ (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५६ बालके अशी आढळलीत की त्यांच्या आई-वडिलांपैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला, तर ३ बालकांचे आई-वडील दोघेही मरण पावले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६७५ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ वर्षांखालील ५६ बालके अशी आढळली की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेले. जिल्हाभरातील माहिती घेणे सुरू असल्याने हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दल गठन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत गावस्तरापासून ही माहिती संकलित केली जात आहे.

...........................

मिळेल बालसंगोपन योजनेचा लाभ

-आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १८ वर्षांखालील बालकाला बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ५६७ बालकांना ४२५ रुपये दरमहा ही मदत देण्यात येते.

-शासनाने या संगोपन योजनेच्या लाभात वाढ केली असून, ११०० रुपयांप्रमाणे मदत एप्रिल महिन्यापासून देण्याचे शासनाने ठरविले; परंतु ही मदत अद्याप देण्यात आली नाही.

- जुन्याच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना संचारबंदीच्या काळात लाभ देण्यात आला नाही. शासनाने विविध घटकांची काळजी घेऊन ५०० कोटींहून अधिकचे पॅकेज ऑटोचालक, फेरीवाले, बांधकाम मजुरांना वाटले; परंतु बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानच दिले नाही. या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुला-मुलींचा शोध ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविकांमार्फत घेतला जात आहे. कोविड मृताचे नाव, वय, पत्ता, पालक संपर्क पत्ता व पूरक माहिती संकलित केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर परिविक्षा अधिकारी (गृह) चौकशी करतात. त्यानंतर बालसंगोपन योजना किंवा बालगृहातून लाभ देण्याबाबत निर्देश असल्याचे परिविक्षा अधिकारी गोबाळे यांनी सांगितले.

...............................................

कोरोनाने आई किंवा वडील हिरावलेल्यांची संख्या ५६

मुले--२५

मुली-- ३१

..............................

कोट

महाराष्ट्र शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयानुसार विविध विभागांकडून ग्रामपातळीवर एक पालक, दोन्ही पालक गमावल्याची माहिती घेतली जात आहे. शहरी भागात नगर परिषद व आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. अशा बालकांचे बालसंगोपन योजना, बालगृहाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन केले जाणार आहे. एकही मूल उघड्यावर राहणार नाही. दर आठवड्याला संकलित होणारी अद्ययावत माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविली जात आहे.

- तुषार पवनीकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी, गोंदिया.