शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

कोरोनामुळे ५६ बालके झाली अनाथ (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५६ बालके अशी आढळलीत की त्यांच्या आई-वडिलांपैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला, तर ३ बालकांचे आई-वडील दोघेही मरण पावले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६७५ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ वर्षांखालील ५६ बालके अशी आढळली की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेले. जिल्हाभरातील माहिती घेणे सुरू असल्याने हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दल गठन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत गावस्तरापासून ही माहिती संकलित केली जात आहे.

...........................

मिळेल बालसंगोपन योजनेचा लाभ

-आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १८ वर्षांखालील बालकाला बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ५६७ बालकांना ४२५ रुपये दरमहा ही मदत देण्यात येते.

-शासनाने या संगोपन योजनेच्या लाभात वाढ केली असून, ११०० रुपयांप्रमाणे मदत एप्रिल महिन्यापासून देण्याचे शासनाने ठरविले; परंतु ही मदत अद्याप देण्यात आली नाही.

- जुन्याच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना संचारबंदीच्या काळात लाभ देण्यात आला नाही. शासनाने विविध घटकांची काळजी घेऊन ५०० कोटींहून अधिकचे पॅकेज ऑटोचालक, फेरीवाले, बांधकाम मजुरांना वाटले; परंतु बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानच दिले नाही. या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुला-मुलींचा शोध ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविकांमार्फत घेतला जात आहे. कोविड मृताचे नाव, वय, पत्ता, पालक संपर्क पत्ता व पूरक माहिती संकलित केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर परिविक्षा अधिकारी (गृह) चौकशी करतात. त्यानंतर बालसंगोपन योजना किंवा बालगृहातून लाभ देण्याबाबत निर्देश असल्याचे परिविक्षा अधिकारी गोबाळे यांनी सांगितले.

...............................................

कोरोनाने आई किंवा वडील हिरावलेल्यांची संख्या ५६

मुले--२५

मुली-- ३१

..............................

कोट

महाराष्ट्र शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयानुसार विविध विभागांकडून ग्रामपातळीवर एक पालक, दोन्ही पालक गमावल्याची माहिती घेतली जात आहे. शहरी भागात नगर परिषद व आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. अशा बालकांचे बालसंगोपन योजना, बालगृहाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन केले जाणार आहे. एकही मूल उघड्यावर राहणार नाही. दर आठवड्याला संकलित होणारी अद्ययावत माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविली जात आहे.

- तुषार पवनीकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी, गोंदिया.