शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:36 IST

जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली.

ठळक मुद्देआ.गोपालदास अग्रवाल : तालुक्यात ठिकठिकाणी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली. मात्र काँग्रेस पक्षाने सुरूवातीपासूनच दिलेला शब्द पाळला. ग्रामीण भागाच्या सर्वांगिन विकासासाठी सर्व जनतेनी साथ द्यावी. काम करणाºयांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.तालुक्यातील अर्जुनी येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती विमल नागपूरे, जि.प.सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, माजी सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, योगराज उपराडे, अनिल मते, आशिष गणविर, रुद्रसेन खांडेकर उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, सरकारने नोटबंदी करुन जनधनच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.त्या आश्वासनाची देखील त्यांनी पूर्तत: केली नाही. शेतकºयांना ऐतिहासीक कर्जमाफी दिल्याचे श्रेय भाजपाचे नेते लाटत आहे. मात्र दुसरीकडे कर्जमाफीसाठी विविध अटी शर्ती लागू करुन शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. काँग्रेसने मागील दहा वर्षांत धानाच्या हमीभावात वाढ करुन दर १४७० रुपयांपर्यंत पोहचविले. तर सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव देऊ असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र त्या आश्वासनाची देखील पूर्तत: केलेली नाही. काँग्रेसने नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. ग्रामीण भागाचा कायापालट करणे हेच आमचे मुख्य ध्येय असून जनतेनी साथ देण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले.रजेगाव प्रकल्प ठरला वरदानया परिसरातील शेतकºयांची सिंचनाची समस्या कायमस्वरुपी दूर व्हावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे परिसरातील ३ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय झाली. त्यामुळे अशी विकास कामे करणाºयांच्या पाठीशी जनतेने सक्षमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.संवाद साधून घेतला आढावाआ.अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील विविध गावांना भेटी देत गावकºयांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. वरठी, गुदमा, अदासी, ढाकणी, पिंडकेपार, नंगपुरा मुर्रीे, रापेवाडा, कारंजा येथे भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला.