शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:36 IST

जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली.

ठळक मुद्देआ.गोपालदास अग्रवाल : तालुक्यात ठिकठिकाणी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली. मात्र काँग्रेस पक्षाने सुरूवातीपासूनच दिलेला शब्द पाळला. ग्रामीण भागाच्या सर्वांगिन विकासासाठी सर्व जनतेनी साथ द्यावी. काम करणाºयांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.तालुक्यातील अर्जुनी येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती विमल नागपूरे, जि.प.सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, माजी सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, योगराज उपराडे, अनिल मते, आशिष गणविर, रुद्रसेन खांडेकर उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, सरकारने नोटबंदी करुन जनधनच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.त्या आश्वासनाची देखील त्यांनी पूर्तत: केली नाही. शेतकºयांना ऐतिहासीक कर्जमाफी दिल्याचे श्रेय भाजपाचे नेते लाटत आहे. मात्र दुसरीकडे कर्जमाफीसाठी विविध अटी शर्ती लागू करुन शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. काँग्रेसने मागील दहा वर्षांत धानाच्या हमीभावात वाढ करुन दर १४७० रुपयांपर्यंत पोहचविले. तर सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव देऊ असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र त्या आश्वासनाची देखील पूर्तत: केलेली नाही. काँग्रेसने नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. ग्रामीण भागाचा कायापालट करणे हेच आमचे मुख्य ध्येय असून जनतेनी साथ देण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले.रजेगाव प्रकल्प ठरला वरदानया परिसरातील शेतकºयांची सिंचनाची समस्या कायमस्वरुपी दूर व्हावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे परिसरातील ३ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय झाली. त्यामुळे अशी विकास कामे करणाºयांच्या पाठीशी जनतेने सक्षमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.संवाद साधून घेतला आढावाआ.अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील विविध गावांना भेटी देत गावकºयांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. वरठी, गुदमा, अदासी, ढाकणी, पिंडकेपार, नंगपुरा मुर्रीे, रापेवाडा, कारंजा येथे भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला.