शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:25 IST

अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस ...

अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन-प्रशासन व पोलीस विभाग करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी सहकार्य करावे, असे अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी केले आहे.

तोंडले यांनी, दुकानदारांनी स्वतः व आपल्या दुकानातील कामगार व्यक्तींना मास्क परिधान करण्याकरिता सक्ती करावी, तसेच आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क नसल्यास प्रवेश नाकारावा, दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, दुकानासमोर सॅनिटायझर ठेवावे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे १ ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी आहे. या संचारबंदी दरम्यान ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद होणार आहे, तसेच दिवसा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत मास्क न लावणाऱ्या व्यक्तीवर ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. रात्री संचारबंदीच्या दरम्यान दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे, असे सांगितले, तसेच विनापरवानगी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच कार्यक्रमात गर्दी करू नये. १ ते ३० एप्रिलपर्यंत कुठेही आठवडी बाजार भरणार नाही व आठवडी बाजार भरवून विनाकारण गर्दी करू नये. आठवडी बाजार भरविण्यास व गर्दी केल्यास त्यांच्यावर कलम १८८ भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. तरी सर्व जनतेने शासनाने दिलेले आदेश व सूचना, तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून स्वतः, तसेच आपल्या परिवारातील सदस्य, गावातील व परिसरातील जनतेला कोरोना रोगाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे तोंडले यांनी कळविले आहे.