शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:25 IST

अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस ...

अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन-प्रशासन व पोलीस विभाग करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी सहकार्य करावे, असे अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी केले आहे.

तोंडले यांनी, दुकानदारांनी स्वतः व आपल्या दुकानातील कामगार व्यक्तींना मास्क परिधान करण्याकरिता सक्ती करावी, तसेच आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क नसल्यास प्रवेश नाकारावा, दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, दुकानासमोर सॅनिटायझर ठेवावे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे १ ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी आहे. या संचारबंदी दरम्यान ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद होणार आहे, तसेच दिवसा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत मास्क न लावणाऱ्या व्यक्तीवर ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. रात्री संचारबंदीच्या दरम्यान दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे, असे सांगितले, तसेच विनापरवानगी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच कार्यक्रमात गर्दी करू नये. १ ते ३० एप्रिलपर्यंत कुठेही आठवडी बाजार भरणार नाही व आठवडी बाजार भरवून विनाकारण गर्दी करू नये. आठवडी बाजार भरविण्यास व गर्दी केल्यास त्यांच्यावर कलम १८८ भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. तरी सर्व जनतेने शासनाने दिलेले आदेश व सूचना, तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून स्वतः, तसेच आपल्या परिवारातील सदस्य, गावातील व परिसरातील जनतेला कोरोना रोगाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे तोंडले यांनी कळविले आहे.