शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

समन्वयातून ठेवणार पूर परिस्थितीवर नियंत्रण

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

नद्यांना पूर आल्यावर नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरुन जीवित व वित्तीय हाणी

 गोंदिया : नद्यांना पूर आल्यावर नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरुन जीवित व वित्तीय हाणी होऊ नये, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता समन्वय असणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रकल्पातील पाणी कोणत्या वेळेवर व केव्हा सोडणार या आराखड्यासोबतच योग्य समन्वयासाठी भ्रमणध्वनीवर संदेश देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी दिले. वैनगंगा, बाघ व इतर नद्यांना येणाऱ्या पूरामुळे जिवीत व इतर हानी हावून नये याकरीता आंतराज्यीय पूर नियंत्रण समन्वय समितीची सभा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला बालाघाटचे (मध्य प्रदेश) जिल्हाधिकारी व्ही.किरण गोपाल, बालाघाटचे पोलीस अधीक्षक गौरव तिवारी, भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी रवी कुंभारे, शिवणीचे अधीक्षक अभियंता आर.के. जिवारी, कार्यकारी अभियंता अशोककुमार पौरकर, बरघटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनसिंग पटेल, शिवनीचे उपविभागीय अधिकारी के.सी. पराते, बालाघाटचे दीपक आर्या, राजीव सागर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एफ.के. भेमटे उपस्थित होते. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे यांनी यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. संजय सरोवराचा जिल्ह्याला धोका असून संजय सरोवरातील पाणी सोडल्यामुळे वैनगंगा नदीला पूर येतो. शिवणी ते रजेगाव हे १७० किमी अंतर असून यावेळी बाघ नदी, भंडारा जिल्ह्यातील सूर नदी, बावनथडी, चूलबंद, कन्हान व गाढवी नदीचे क्षेत्रही यावेळी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे दाखविण्यात आले. तेथील समन्वय साधण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. पूर परिस्थितीने गोंदिया जिल्ह्यातील ८७ गावे प्रभावित होवू शकतात. तसेच संजय सरोवर, पूजारीटोला व बावनथडी येथील पाण्याच्या पातळीचे होणारे प्रमाण याचीही माहिती यावेळी देण्यात आली. संबंधित विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यक त्या सर्व बाबी प्रशासनाने केल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे धरणाच्या क्षमतेनूसार पाण्याचा साठा करावा असेही त्यांनी सांगितले. बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही.किरण गोपाल यांनीही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याबाबत निर्देश दिले. (जिल्हा प्रतिनिधी)