शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

समन्वयातून ठेवणार पूर परिस्थितीवर नियंत्रण

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

नद्यांना पूर आल्यावर नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरुन जीवित व वित्तीय हाणी

 गोंदिया : नद्यांना पूर आल्यावर नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरुन जीवित व वित्तीय हाणी होऊ नये, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता समन्वय असणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रकल्पातील पाणी कोणत्या वेळेवर व केव्हा सोडणार या आराखड्यासोबतच योग्य समन्वयासाठी भ्रमणध्वनीवर संदेश देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी दिले. वैनगंगा, बाघ व इतर नद्यांना येणाऱ्या पूरामुळे जिवीत व इतर हानी हावून नये याकरीता आंतराज्यीय पूर नियंत्रण समन्वय समितीची सभा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला बालाघाटचे (मध्य प्रदेश) जिल्हाधिकारी व्ही.किरण गोपाल, बालाघाटचे पोलीस अधीक्षक गौरव तिवारी, भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी रवी कुंभारे, शिवणीचे अधीक्षक अभियंता आर.के. जिवारी, कार्यकारी अभियंता अशोककुमार पौरकर, बरघटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनसिंग पटेल, शिवनीचे उपविभागीय अधिकारी के.सी. पराते, बालाघाटचे दीपक आर्या, राजीव सागर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एफ.के. भेमटे उपस्थित होते. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे यांनी यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. संजय सरोवराचा जिल्ह्याला धोका असून संजय सरोवरातील पाणी सोडल्यामुळे वैनगंगा नदीला पूर येतो. शिवणी ते रजेगाव हे १७० किमी अंतर असून यावेळी बाघ नदी, भंडारा जिल्ह्यातील सूर नदी, बावनथडी, चूलबंद, कन्हान व गाढवी नदीचे क्षेत्रही यावेळी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे दाखविण्यात आले. तेथील समन्वय साधण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. पूर परिस्थितीने गोंदिया जिल्ह्यातील ८७ गावे प्रभावित होवू शकतात. तसेच संजय सरोवर, पूजारीटोला व बावनथडी येथील पाण्याच्या पातळीचे होणारे प्रमाण याचीही माहिती यावेळी देण्यात आली. संबंधित विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यक त्या सर्व बाबी प्रशासनाने केल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे धरणाच्या क्षमतेनूसार पाण्याचा साठा करावा असेही त्यांनी सांगितले. बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही.किरण गोपाल यांनीही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याबाबत निर्देश दिले. (जिल्हा प्रतिनिधी)