शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:32 IST

प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअनिल राठी : वार्षिक स्नेहसंमेलन, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करावे, शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया आहे,असे उद्गार अमरावती येथील राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक अनिल राठी यांनी व्यक्त केले.सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूल व एसडीसी कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटिका डॉ. सोनल चांडक, किरण रापतवार, अध्यक्ष डॉ. वल्लभदास भुतडा, संस्था सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, मुकेश शेंडे, सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक कुंडलिक लोथे, प्रा. इंद्रनिल काशिवार, विष्णू चाचेरे,विद्यार्थी प्रतिनिधी गौरांग खोटेले, सलोनी बघेले उपस्थित होते. देवी सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करुन वार्षिकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिल मंत्री यांनी तर शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षिका वीना नानोटी यांनी केले. परिचय संयोजक कुंडलिक लोथे यांनी करुन दिला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी जयंत लोणारे, दिव्यानी शहारे, अवंती राऊत, आशिष कापगते, सलोनी पालीवाल, अनुष्का ब्राम्हणकर, प्रशिक शहारे, अनघा पिल्लेवार, कलाध्यापक रुपराम धकाते यांचा सत्कार करण्यात आला. विविध हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.कलाध्यापक रुपराम धकाते यांनी संस्थाध्यक्ष घनश्यामदास भुतडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. सुशिलादेवी भुतडा, पुष्पा भैय्या, डॉ.वल्लभदास भुतडा यांनी ती स्विकारली. संस्थेतर्फे अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करुन यशाचे शिखर गाठावे असे डॉ. वल्लभदास भुतडा यांनी सांगीतले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन संजयकुमार बंगळे व अर्चना गुुरुनुले यांनी केले तर आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षण