शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:32 IST

प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअनिल राठी : वार्षिक स्नेहसंमेलन, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करावे, शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया आहे,असे उद्गार अमरावती येथील राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक अनिल राठी यांनी व्यक्त केले.सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूल व एसडीसी कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटिका डॉ. सोनल चांडक, किरण रापतवार, अध्यक्ष डॉ. वल्लभदास भुतडा, संस्था सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, मुकेश शेंडे, सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक कुंडलिक लोथे, प्रा. इंद्रनिल काशिवार, विष्णू चाचेरे,विद्यार्थी प्रतिनिधी गौरांग खोटेले, सलोनी बघेले उपस्थित होते. देवी सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करुन वार्षिकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिल मंत्री यांनी तर शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षिका वीना नानोटी यांनी केले. परिचय संयोजक कुंडलिक लोथे यांनी करुन दिला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी जयंत लोणारे, दिव्यानी शहारे, अवंती राऊत, आशिष कापगते, सलोनी पालीवाल, अनुष्का ब्राम्हणकर, प्रशिक शहारे, अनघा पिल्लेवार, कलाध्यापक रुपराम धकाते यांचा सत्कार करण्यात आला. विविध हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.कलाध्यापक रुपराम धकाते यांनी संस्थाध्यक्ष घनश्यामदास भुतडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. सुशिलादेवी भुतडा, पुष्पा भैय्या, डॉ.वल्लभदास भुतडा यांनी ती स्विकारली. संस्थेतर्फे अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करुन यशाचे शिखर गाठावे असे डॉ. वल्लभदास भुतडा यांनी सांगीतले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन संजयकुमार बंगळे व अर्चना गुुरुनुले यांनी केले तर आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षण