शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:32 IST

प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअनिल राठी : वार्षिक स्नेहसंमेलन, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करावे, शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया आहे,असे उद्गार अमरावती येथील राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक अनिल राठी यांनी व्यक्त केले.सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूल व एसडीसी कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटिका डॉ. सोनल चांडक, किरण रापतवार, अध्यक्ष डॉ. वल्लभदास भुतडा, संस्था सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, मुकेश शेंडे, सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक कुंडलिक लोथे, प्रा. इंद्रनिल काशिवार, विष्णू चाचेरे,विद्यार्थी प्रतिनिधी गौरांग खोटेले, सलोनी बघेले उपस्थित होते. देवी सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करुन वार्षिकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिल मंत्री यांनी तर शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षिका वीना नानोटी यांनी केले. परिचय संयोजक कुंडलिक लोथे यांनी करुन दिला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी जयंत लोणारे, दिव्यानी शहारे, अवंती राऊत, आशिष कापगते, सलोनी पालीवाल, अनुष्का ब्राम्हणकर, प्रशिक शहारे, अनघा पिल्लेवार, कलाध्यापक रुपराम धकाते यांचा सत्कार करण्यात आला. विविध हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.कलाध्यापक रुपराम धकाते यांनी संस्थाध्यक्ष घनश्यामदास भुतडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. सुशिलादेवी भुतडा, पुष्पा भैय्या, डॉ.वल्लभदास भुतडा यांनी ती स्विकारली. संस्थेतर्फे अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करुन यशाचे शिखर गाठावे असे डॉ. वल्लभदास भुतडा यांनी सांगीतले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन संजयकुमार बंगळे व अर्चना गुुरुनुले यांनी केले तर आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षण