शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: December 6, 2014 01:45 IST

महिंद्रा बोलेरो मॅक्स पिक-अप वाहनाचा अपघाती विमा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने ....

गोंदिया : महिंद्रा बोलेरो मॅक्स पिक-अप वाहनाचा अपघाती विमा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने झटका देत ग्राहकाला दिलासा दिला. यात वाहन विम्याची रक्कम ४ लाख ४७ हजार ४१६ रूपये नऊ टक्के व्याजाने ग्राहकाला सदर विमा कंपनीने द्यावे, असा आदेश दिला.दीपक रामदेव जायस्वाल रा.मनोहर चौक गोंदिया असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी रिलायंस विमा कंपनीकडून सदर वाहनाची विमा पॉलिसी २० मे २०१२ ते १९ मे २०१३ या कालावधीसाठी घेतली होती. यानंतर १४ फेब्रुवारी २०१३ रोजी सदर वाहनाचा अपघात झाला. या घटनेची तक्रार गोंदिया पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी अपघाताची चौकशी करून जायस्वाल यांना कागदपत्रे दिली. यानंतर त्यांनी सदर विमा कंपनीकडे विमा दावा मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह अर्ज केला. परंतु कंपनीने कोणतेही संयुक्तिक कारण न देता दावा फेटाळला. त्यामुळे जायस्वाल यांनी सर्व्हेअरच्या रिपोर्टनुसार, चार लाख ४७ हजार ४२६ रूपये नुकसानभरपाईसह मिळावे म्हणून ३० जानेवारी २०१४ रोजी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली. यानंतर विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली. कंपनीने १९ जून २०१४ रोजी आपल्या लेखी जबाबात, वेळोवेळी संबंधित कागदपत्रांची मागणी करूनही तक्रारकर्त्याने त्यांची पूर्तता न केल्यामुळे विमा दावा बंद करण्यात आला, असे सांगितले. मात्र जायस्वाल यांनी सर्व कागदपत्रे दाखल केले होते. शिवाय त्यांचे वकील अ‍ॅड. एम.के. गुप्ता यांनी असा युक्तिवाद केला की, अपघात १४ फेब्रुवारी २०१३ रोजी झाला. याची माहिती विमा कंपनीला देण्यात आली, त्यावेळी कंपनीने कोणताही आक्षेप घेतना नाही. जायस्वाल यांनी अपघातानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस ठाण्याचा एफआयआर, इन्क्वेस्ट पंचनामा, अंतिम अहवाल तक्रारीत दाखल केल्यामुळे त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे सिद्ध होते. संपूर्ण कागदपत्रे देवूनही दावा तांत्रिक मुद्द्यांवरून व संयुक्तिक कारण न देता खारिज करणे हीसुद्धा सेवेतील त्रुटी आहे, असा युक्तिवाद करून प्रकरण मंजूर करण्याची विनंती केली.यावर विरूद्ध पक्ष रिलायंस विमा कंपनीचे वकील अ‍ॅड. सुचिता देहाडराय यांनी असा युक्तिवाद केला की, विमा दावा दाखल केल्यावर कंपनीने ६ मार्च २०१३ व २४ जून २०१३ रोजी नाव व पत्ता असलेल्या ओळखपत्रांची मागणी केली होती. परंतु या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने विमा कंपनीने दावा खारिज केल्याचे पत्र ८ आॅक्टोबर २०१३ रोजी जायस्वाल यांना दिले होते. त्यामुळे कंपनीच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसून सदर प्रकरण खर्चासह खारिज करण्यात यावे, अशी त्यांनी न्यायमंचाला विनंती केली.दोन्ही पक्षांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद व दोन्ही पक्षांकडून सादर केलेली कागदपत्रे आदी बाबींची न्यायमंचाने कारणमिमांसा केली व तक्रारकर्ते जायस्वाल यांची तक्रार अंशत: मान्य केली. तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या विम्याची रक्कम चार लाख ४७ हजार ४१६ रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने ३० जानेवारी २०१४ पासून संपूर्ण रूपये मिळेपर्यंत द्यावे, तक्रारकर्त्याच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई १० हजार रूपये द्यावे, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने कंपनीला दिला. (प्रतिनिधी)