शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

गरज नसताना डांबरी रस्त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 18:04 IST

शासकीय निधीची उधळपट्टी : चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोहमारा : दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या पक्क्या डांबरी रस्त्यावर गरज नसताना सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून शासकीय निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार सध्या सडक अर्जुनी तालुक्यात सुरू आहे. शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत बानटोला ते कोहळीटोला, कोल्हारगाव ते कोसंबी कनेरी ते गोंडउमरी या गावांतर्गत रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. हे रस्ते चांगले असतानाही चालू आर्थिक वर्षात या रस्त्यावर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे.

डांबरीकरणाचे पक्के रस्ते सुस्थितीत असताना सिमेंट रस्त्यांची गरज का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टीच असून, निधीची उधळपट्टी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेतात याकडे आता या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींकडून कामाची शिफारसलोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाचा विकास निधी खर्च करीत असतात. स्थानिक विकास निधीबरोबरच शासनाच्या ३०५४//२५१५ या लेखाशीर्षांतर्गत खर्च करावयाच्या निधीसाठी कार्यकर्त्या- कडून कामाची यादी मागवितात. यात सर्वात जास्त रस्ते व नाली बांधकामाची कामे असतात. बरेच कार्यकर्ते हे कंत्राटदार असल्याने अन्य योजनांतून झालेल्या रस्त्याची कामे जास्त मागतात. त्याच कामाला निधी मंजूर होतो. मात्र बांधकाम विभागाकडून सुचविलेल्या कामावर नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे किंवा नाही याची शहानिशा न करता सरसकट अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्याचा सध्या सपाट सुरु असल्याचे चित्र आहे.

एकाच रस्त्याचे वांरवार बांधकामसर्वसामान्य नागरिकाकडून चांगल्या दर्जाचे मजबूत डांबरी रस्त्यावर नव्याने बांधकाम का करतात अशी विचारणा केली असता शासनाकडून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. आलेला निधी परत जाता कामा नये असे सांगून बांधकाम केले जात असल्याचे उत्तर दिले जाते. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कनेरी ते गोंडउमरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचेसार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत कनेरी ते गोंडउमरीरस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक ग्रामपंचायत पदाधि- काऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. हा रस्ता दोन महिन्यांतच उखडायला लागला आहे.

रस्ता बांधकामात रोपट्यांची कत्तलसामाजिक वनीकरण विभागा- कडून राज्यमार्ग तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. या विभागाकडून सलग तीन वर्षे रोपट्यांची देखभाल व जोपासना केली जाते. रस्ता बांधकामासाठी लागणारे साहित्य या रोपट्यांवर पडत असल्याने अनेक रोपटे नष्ट झाली आहेत. रस्ते बांधकामात रोपट्यांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Governmentसरकारroad transportरस्ते वाहतूकCorruptionभ्रष्टाचार