शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

गरज नसताना डांबरी रस्त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 18:04 IST

शासकीय निधीची उधळपट्टी : चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोहमारा : दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या पक्क्या डांबरी रस्त्यावर गरज नसताना सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून शासकीय निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार सध्या सडक अर्जुनी तालुक्यात सुरू आहे. शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत बानटोला ते कोहळीटोला, कोल्हारगाव ते कोसंबी कनेरी ते गोंडउमरी या गावांतर्गत रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. हे रस्ते चांगले असतानाही चालू आर्थिक वर्षात या रस्त्यावर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे.

डांबरीकरणाचे पक्के रस्ते सुस्थितीत असताना सिमेंट रस्त्यांची गरज का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टीच असून, निधीची उधळपट्टी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेतात याकडे आता या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींकडून कामाची शिफारसलोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाचा विकास निधी खर्च करीत असतात. स्थानिक विकास निधीबरोबरच शासनाच्या ३०५४//२५१५ या लेखाशीर्षांतर्गत खर्च करावयाच्या निधीसाठी कार्यकर्त्या- कडून कामाची यादी मागवितात. यात सर्वात जास्त रस्ते व नाली बांधकामाची कामे असतात. बरेच कार्यकर्ते हे कंत्राटदार असल्याने अन्य योजनांतून झालेल्या रस्त्याची कामे जास्त मागतात. त्याच कामाला निधी मंजूर होतो. मात्र बांधकाम विभागाकडून सुचविलेल्या कामावर नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे किंवा नाही याची शहानिशा न करता सरसकट अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्याचा सध्या सपाट सुरु असल्याचे चित्र आहे.

एकाच रस्त्याचे वांरवार बांधकामसर्वसामान्य नागरिकाकडून चांगल्या दर्जाचे मजबूत डांबरी रस्त्यावर नव्याने बांधकाम का करतात अशी विचारणा केली असता शासनाकडून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. आलेला निधी परत जाता कामा नये असे सांगून बांधकाम केले जात असल्याचे उत्तर दिले जाते. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कनेरी ते गोंडउमरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचेसार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत कनेरी ते गोंडउमरीरस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक ग्रामपंचायत पदाधि- काऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. हा रस्ता दोन महिन्यांतच उखडायला लागला आहे.

रस्ता बांधकामात रोपट्यांची कत्तलसामाजिक वनीकरण विभागा- कडून राज्यमार्ग तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. या विभागाकडून सलग तीन वर्षे रोपट्यांची देखभाल व जोपासना केली जाते. रस्ता बांधकामासाठी लागणारे साहित्य या रोपट्यांवर पडत असल्याने अनेक रोपटे नष्ट झाली आहेत. रस्ते बांधकामात रोपट्यांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Governmentसरकारroad transportरस्ते वाहतूकCorruptionभ्रष्टाचार