शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

जिल्ह्यातील पुरातन वृक्षांचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:14 IST

गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्टया संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या....

राजकुमार बडोले : जागतिक पर्यावरण दिन कार्यक्र म लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्टया संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने वृक्ष आहे, त्या वृक्षांचे जतन करु न त्यांचे संवर्धन करावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. सोमवारी (दि.५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नवेगावबांध जलाशय परिसराला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सहायक वनसंरक्षक उदापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी खान, रहांगडाले, उपअभियंता समीर बन्सोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नागपूर येथील वास्तू विशारद भिवगडे, विनोद नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते. नामदार बडोले यांनी, अलिकडच्या काळात वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडत आहे. पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करु न त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची आज गरज आहे. शासनाने ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्र म हाती घेतला असून यावर्षी चार कोटी झाडे लावण्याचा संपल्प केला आहे. जिल्ह्यात निसर्ग संपदा समृध्द आहे. परंतू ही निसर्ग संपदा पुढील पिढीसाठी टिकवून ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाने एक नाविण्यपूर्ण उपक्र म आखलेला असून या उपक्र माद्वारे ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने वृक्ष आहे त्या शेतकऱ्यांनी हे वृक्ष जतन करु न ठेवावे. या उपक्र मातून शेतकऱ्यांना पुरातन वृक्षांचे जतन करण्यासाठी दरवर्षी एक हजार रु पये देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या नाविण्यपूर्ण योजनेत शेतक ऱ्यांना वन्य पशूपक्षी व पर्यावरण संतूलन यासाठी उपयुक्त अशा ५० ते १०० वर्ष वयाच्या वृक्षांचे जतन करण्यासाठी जास्तीत जास्त १० वृक्षांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या वृक्षांमध्ये मात्र परदेशी वृक्ष जसे- निलगीरी, पेल्टाफोरम, रेनट्री, सप्तपर्णी असे वृक्ष असेल तर मदत मिळणार नाही. तसेच ज्यापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे असे- मोह, सागवान या वृक्षांना अनुदान मिळणार नाही. जे भारतीय वृक्ष आहे उदा. चिंच, आंबा, जांभूळ, अंजन, धावडा, बेहडा, हिरडा, पळस इत्यादी सर्व वृक्षांना हे अनुदान लागू राहणार आहे. जे भारतीय प्रजातीचे मोठे उंच पुरातन वृक्ष आहे त्याची गणना करण्याचे काम वन विभागामार्फत सुरु आहे. या गणनेमध्ये शेतकऱ्यांनी आपले पुरातन वृक्ष नोंदविले जातील याची काळजी घ्यावी. या उपक्र माची शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती होवून त्यांनी सर्वत्र आपल्या झाडाची नोंद वन विभागाकडे करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी नामदार बडोले यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने नवेगावबांध जलाशय परिसरात बांधण्यात येत असलेल्या रिसॉर्टच्या कामाची पाहणी केली. जवळपास १० डिलक्स रु म, २ लोक निवास प्रत्येकी १० व्यक्तींच्या क्षमतेचे बांधण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट 5 हेक्टर क्षेत्रात बांधण्यात येणार असून यावर आठ कोटी रु पये खर्च होणार आहे. यावेळी त्यांनी जलाशय परिसरात बांधण्यात येत असलेल्या बीचचीही पाहणी केली. पाच कोटी पर्यंत येथे आणखी पर्यटन विकास कामे करण्याचे प्रस्ताव तयार करावे अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी केली.