शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र काँग्रेस लढणार - विजय वडेट्टीवार

By अंकुश गुंडावार | Updated: August 10, 2023 17:17 IST

पत्रकार परिषदेत दिली माहिती

गोंदिया : महाविकास आघाडीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. तसेच काँग्रेससाठी या मतदारसंघात अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात असणार असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि.१०) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, प्रदेश महासचिव नामदेव किरसान, पी.जी.कटरे, किसान काँग्रेसचे जितेश राणे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे व पदाधिकारी उपस्थित होते. ना. वडेट्टीवार म्हणाले मी उमेदवार ठरवायला नव्हे तर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आलो आहे. पदाधिकाऱ्यांसह चर्चा करुन बूथ कमिट्या, आघाड्या यांची माहिती जाणून घेतली. तसेच सर्वांनीच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक काँग्रेसने लढवावी अशी भूमिका मांडल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण नसून मतभेद असले तरी विचार एक आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत यांचे चांगले परिणाम दिसून येतील असे सांगितले. तसेच ज्यांचा पाय ईडीच्या चिखलात फसला आहे, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप तेच नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. केवळ महागाई, बेरोजगारी याशिवाय या सरकारने काहीच दिले नाही. उज्ज्वला योजने अंतर्गत वाटप केलेल्या ९ कोटी गॅस सिलिंडर पैकी ८० टक्के सिलिंडरचे दरामुळे रिफिलिंगच होत नसल्याचे पुढे असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

ट्रिपल इंजिन सरकार नव्हे रक्त शोषणारे सरकार

महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी आधी शिंदे आणि अजित पवार हे सोबत आले आहे. यामुळे महाराष्ट्र विकासाचा वेग या ट्रिपल इंजिनमुळे वेगाने होईल भासविले जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यात या विरोधी चित्र असून हे ट्रिपल इंजिन सरकार नव्हे तर राज्यातील जनतेचे रक्त शोषणारे सरकार असल्याची टिका ना. विजय वडेट्टीवार यांनी केली.

भाजप सरकार ओबीसी हितेशी नव्हे तर विरोधी

आरक्षण संपुष्टात आणण्याचे धोरण असणारे भाजप सरकार हे ओबीसी हितेशी असूच शकत नाही. या सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ओबीसींची जातीनिहाय जनगणना का केली नाही, तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनी ओबीसींना शिष्यवृत्ती लागू केली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण