शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

धान उत्पादकांना मदत करण्याची पंरपरा काँग्रेसने सुरु केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:27 IST

काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : नवेगाव येथे सातबारा वितरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात या मदतीत सातत्याने वाढ करण्यात आल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील नवेगाव येथे शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारामधील त्रृटी नि:शुल्क दुरूस्ती करुन नवीन सातबारा वितरण कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, बाबुलाल पटले, तहसीलदार राजेश भांडारकर, सरपंच मदन सोयाम जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुुले, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद तुरकर, आशिष चव्हान, जाकीर खान, विमल नागपूरे, किशोर बघेले, हनस गराडे, रेखा चिखलोंढे,चैनलाल लिल्हारे,भूमेश्वर बागडे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले धान उत्पादक शेतकऱ्यांना सातबाऱ्यातील त्रृटीमुळे जमिनीची खरेदी विक्री तसेच विविध कामात अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तर महसूल विभागाकडून यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात होती. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या सातबारातील त्रृटी नि:शुल्क दूर करण्यासाठी शिबिर घेतले. त्यानंतर सातबारातील त्रृृटी दूर करुन नवीन सातबाराचे वाटप गिरोला, पिपरटोला येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या क्षेत्रातील जनतेच्या प्रेम आणि विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही यांनी त्यांनी या वेळी दिली. रमेश अंबुले यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळेच या क्षेत्रातील जनतेच्या अनेक समस्या मार्गी लागल्या असून अनेक विकास कामे करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जवळपास १५०० शेतकºयांना सातबाºयातील त्रृटी दूर करुन नवीन सातबाराचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल