शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

धान उत्पादकांना मदत करण्याची पंरपरा काँग्रेसने सुरु केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:27 IST

काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : नवेगाव येथे सातबारा वितरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात या मदतीत सातत्याने वाढ करण्यात आल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील नवेगाव येथे शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारामधील त्रृटी नि:शुल्क दुरूस्ती करुन नवीन सातबारा वितरण कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, बाबुलाल पटले, तहसीलदार राजेश भांडारकर, सरपंच मदन सोयाम जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुुले, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद तुरकर, आशिष चव्हान, जाकीर खान, विमल नागपूरे, किशोर बघेले, हनस गराडे, रेखा चिखलोंढे,चैनलाल लिल्हारे,भूमेश्वर बागडे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले धान उत्पादक शेतकऱ्यांना सातबाऱ्यातील त्रृटीमुळे जमिनीची खरेदी विक्री तसेच विविध कामात अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तर महसूल विभागाकडून यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात होती. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या सातबारातील त्रृटी नि:शुल्क दूर करण्यासाठी शिबिर घेतले. त्यानंतर सातबारातील त्रृृटी दूर करुन नवीन सातबाराचे वाटप गिरोला, पिपरटोला येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या क्षेत्रातील जनतेच्या प्रेम आणि विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही यांनी त्यांनी या वेळी दिली. रमेश अंबुले यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळेच या क्षेत्रातील जनतेच्या अनेक समस्या मार्गी लागल्या असून अनेक विकास कामे करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जवळपास १५०० शेतकºयांना सातबाºयातील त्रृटी दूर करुन नवीन सातबाराचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल