शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर धडकले काँग्रेसचे मोर्चे

By admin | Updated: February 7, 2015 01:02 IST

केंद्र व राज्य शासनातील भाजपने निवडणुकीपूर्वी शेतकरी व सामान्य जनतेला अनेक आश्वासने दिलीत. परंतु सत्ता मिळताच त्यांची आश्वासने खोटी ठरली.

गोंदिया : केंद्र व राज्य शासनातील भाजपने निवडणुकीपूर्वी शेतकरी व सामान्य जनतेला अनेक आश्वासने दिलीत. परंतु सत्ता मिळताच त्यांची आश्वासने खोटी ठरली. त्यामुळे जिल्हारातील शेतकरी व सामान्य जनतेला सोबत घेवून त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाविरूद्ध मोर्चे काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांच्या नावे निवेदने देण्यात आली.देवरी : धान उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ, वाढती महगाई यासह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना घेवून देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ३ फेब्रुवारीला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निवेदन तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव देण्यात यावे, धान उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये बोनस देण्यात यावे, शासन स्तरावरुन देवरी येथे मंजूर करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे स्थानांतरण दुसऱ्या ठिकाणी करण्यात येवू नये, दरवर्षीप्रमाणे तेंदूपत्याचे बोनस त्वरित देण्यात यावे, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विहीर मंज़ूर करून त्वरित विद्युत जोडणी देण्यात यावे या प्रमुख मागण्या व इतर मागण्यांना घेवनू काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा येथील जि.प. क्रीडा संकुलातून प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, जिल्हा सचिव नटवरलाल गांधी, तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेश्याम बगडिया, इंदल अरकरा, आनंद राऊत, धनराज हुकरे आदींनी केले. दरम्यान मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य भोजराज बहेकार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक रामटेके यांनी तर संचालन वसंत पुराम यांनी केले. मोर्चा व सभेसाठीसाठी जि.प. सदस्य संदीप भाटिया, तालुका उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, माजी सभापती भैयालाल टेंभरे, माधुरी कुंभरे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष मंदिरा वालदे, सुषमा पंधरे, अर्चना नारनवरे, माजी पं.स. सदस्य रामेश्वर बहेकार, नूतन बन्सोड, कृपासागर गोपाले, शकील कुरैशी, सुरेंद्र बन्सोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. सडक-अर्जुनी : तालुका काँग्रेस कमिटी सडक-अर्जुनीतर्फे तहसील कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा माजी आ. रामरतनबापू राऊत, माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी, काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते शेषराव गिऱ्हेपुंजे यांच्या नेतृत्वात गुरूवारी ५ फेब्रुवारीला काढण्यात आला.शेकडो शेतकरी-शेतमजुरांचा मोर्चा एमएसईबी कार्यालय सडक अर्जुनी जवळून निघाला व आपल्या मागण्यांचे नारेबाजी करीत तहसील कार्यालयावर धडकला. मोर्च्याचे सभेत रुपांतर होवून माजी आ. रामरतन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या वेळी मंचावर तालुका काँग्रेस अध्यक्ष निताराम देशमुख, राजेश नंदागवळी, शेषराव गिऱ्हेपुंजे, अशोक लंजे, उषा मेंढे, छाया चव्हाण, पं.स. सदस्य नीना राऊत, हिरालाल चव्हाण, केशवराव यावलकर, रमेश चुऱ्हे, राजाभाऊ गुब्रेले, युसूफ पटेल, जि.प. सदस्य जागेश्वर धनभाते, पं.स. सदस्य मधुसूदन दोनोडे, डॉ. श्रद्धा रामटेके, कल्पना गौर, शंकर डोंगरवार, अनिल राजगिरे, संजय बैस उपस्थित होते.काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जे. उईके यांना देण्यात आले. मागण्यांमध्ये पूर्वीप्रमाणे २०० रुपये धानाला बोनस द्यावा, दोन हजार ५०० रुपये धानाला प्रतिक्विंटल भाव द्यावा, भूमी अधिगृहण कायदा रद्द करावा, रोजगार हमीची कामे सुरू करावी, श्ेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफीचा देण्यात यावा, शेतकऱ्यांची वीज जोडणी त्वरित करावी, बीपीएल कार्डधारकांना रेशनचा पुरवठा करावा व योग्य नियंत्रण ठेवावे, सडक-अर्जुनीला उपजिल्हा रुग्णालय सुरु करावे, राज्य तेल मुक्त करावे, अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार उईके यांना देण्यात आले. संचालन अनिल राजगिरे यांनी तर आभार मधुसूदन दोनोडे यांनी मानले. यावेळी माजी आ. रामरतन राऊत राजेश नंदागवळी, केशव यावलकर, अशोक लंजे, रमेश चुऱ्हे, शेषराव गिऱ्हेपुंजे, उषा मेंढे, केशव यावलकर यांनी मार्गदर्शन केले. तिरोडा : येथील काँग्रेस कार्यालयातून तालुका काँग्रेस कमिटीचा मोचार केंद्र व राज्य शासनाच्या विरूद्ध काढण्यात आला. यात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यावर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यासाठी निवेदन देण्यात आले.मागण्यांमध्ये तालुक्यातील भारनियमन बंद करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या धानाला अडीच हजार ते तीन हजार रूपये भाव द्यावे, विजेचे बिल माफ करण्यात यावे, अन्न सुरक्षा योजना नियमित लागू करण्यात यावी, एपीएल धारकांना स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा पुरवठा करण्यात यावा, केरोसिनचा पुरवठा वाढविण्यात यावे, शेतकऱ्यांना मोफत विहिरी बांधून देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देतेवेळी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, डॉ. योगेंद्र भगत, पी.जी. कटरे, देवेंद्र तिवारी, जगदीश येरोला, रमेश पटले, उदेलाल दहीकर, महिला अध्यक्ष पूनम रहांगडाले, उर्मिला रहांगडाले, मजित सवारे, प्रा. विलास मेश्राम, मानिक झंझाळ, जमईवार, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका/शहर प्रतिनिधी)