शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:35 IST

राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल । मोरवाही येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केवळ काँग्रेस सरकारच देऊ शकते असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.आसोली जि.प.पोटनिवडणुकीकरिता आघाडीचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी मोरवाही येथे आयोजित प्रचारसभे ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिभाऊ कावळे, बंटी भेलावे, सरपंच उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणविर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सविता कावडे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, शिवशंकर हुमने, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत पाथोडे, देवानंद कावडे, महेंद्र कोरे सेवंतबाई हेमने, शाम हेमने, कातांबाई भांडारकर, धनलाल गौतम, विनोद ठाकूर, योगराज रिनाईत, मोरोती हेमने, इंदूबाई ठाकूर, कविता कावळे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आसोली जि.प.क्षेत्रातून काँग्रेसचे शेखर पटले हे निवडून आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होत आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादाच्या मुद्दावर जनतेची दिशाभूल करुन सत्ता स्थापन केली. मात्र अद्यापही २०१७ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. २० हजाराहून अधिक घरकुल लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासन फोल ठरत आहेत. जनतेने अशा विश्वासघाती सरकारपासून सावध राहण्याचे आवाहन केले. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक विकास कामे झाले असे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल