शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मिनी मंत्रालयावर काँग्रेस-भाजपचा कब्जा

By admin | Updated: July 16, 2015 01:36 IST

गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला ठेवून भाजपला साथ देत अध्यक्षपद पदरात पाडून घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हिरमोड : अध्यक्षपदी काँग्रेसच्या उषा मेंढे, तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या रचना गहाणे यांची निवडगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला ठेवून भाजपला साथ देत अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. सर्वात कमी १६ सदस्यसंख्या असतानाही काँग्रेसच्या उषा मेंढे अध्यक्षपदी विराजमान झाल्या तर १७ सदस्यसंख्या असलेल्या भाजपच्या वाट्याला उपाध्यक्षपद आले. रचना गहाणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात अतिशय औत्सुक्याच्या, काहीशा तणावपूर्ण आणि नाट्यमय घडामोडींच्या घटनाक्रमात झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अखेर सर्वाधिक २० जागा पटकावूनही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागणार आहे.दुपारी ३ ते ४.३० यादरम्यान जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उषा मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजलक्ष्मी तुरकर तसेच भाजपकडून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी अर्ज भरले होते. तसेच उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पी.जी. कटरे, राष्ट्रवादीकडून गंगाधर परशुरामकर आणि भाजपकडून रचना गहाणे यांनी दुपारी १ वाजेपर्यंत नामांकन भरले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज सुरू झाले त्यावेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी तर उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतून पी.जी.कटरे यांनी माघार घेतली. दुपारी ३ वाजता निवडणुकीसाठी सभा सुरू होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य २.४० ला सभागृहात दाखल झाले. त्यापाठोपाठ भाजपचे सदस्य २.५५ ला तर काँग्रेसचे सदस्य ३ वाजता सभागृहाच्या दारावर पोहोचले. यावेळी भाजपचे आमदार विजय रहांगडाले, आ.संजय पुराम हेसुद्धा सभागृहाबाहेर उपस्थित होते. या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता उषा मेंढे यांना ३३ तर राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांना २० मते पडली. उपाध्यक्षपदाकरिता भाजपच्या रचना गहाणे यांना ३० तर राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना २० मते पडली. काँग्रेसचे सदस्य पी.जी.कटरे, विमल नागपुरे आणि रमेश अंबुले यांनी तटस्थ राहून उपाध्यक्षपदाकरिता कोणालाही मतदान केले नाही.या मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता. (जिल्हा प्रतिनिधी)आता काँग्रेस भाजपाविरूद्ध बोलणार का? आतापर्यंत भाजप सरकारमधील घोटाळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेर काढून त्यांचा चेहरा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप सरकारला धारेवर धरले. पण आता त्याच भाजपसोबत घरोबा करून काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले असून त्या भाजपविरूद्ध आता यांचा आवाज बाहेर निघेल का? अशी शंका या घडामोडीनंतर आयोजित पत्रपरिषदेत आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण घटनाक्रमाचा तपशीलही त्यांनी पत्रकारांपुढे मांडला. यावेळी काँग्रेस आणि भाजपात कशी छुपी युती होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचाही आदेश त्यांनी कसा झुगारला हे पुराव्यासह सांगण्यात आले. या पत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे पर्यवेक्षक नरेश माहेश्वरी, माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, गप्पू गुप्ता, बबलू कटरे आदी उपस्थित होते.