शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

परीक्षा घेणारेच पेपर फोडतात; मग विश्वास ठेवायचा कुणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 16:54 IST

शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे टीईटी परीक्षेतील घोळ उघड : विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम

गोंदिया : शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक होता येत नसल्याने, अनेकांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीईटी दोन वर्षांपासून रखडली होती. अखेर २१ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेत गैरव्यवहार झाल्याने तुकाराम सुपेला पोलिसांनी अटक केली. आता शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. प्राथमिक स्तरावरील पेपर-१ व माध्यमिक स्तरावरील पेपर-२ साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन लाख आहे.

टीईटीसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी

३ लाख ४३ हजार

परीक्षा केंद्रे १४४३

पहिल्या पेपरसाठी केलेली नोंदणी २ लाख ५४ हजार ४२८

परीक्षा दिलेले २ लाख १६ हजार ६०४

दुसऱ्या पेपरसाठी नोंदणी केलेले २ लाख १४ हजार २५०

परीक्षा दिलेले १ लाख ८५ हजार ४३९

दोन वर्षांनी परीक्षा, त्यातही घोळ

राज्यात २०१३ पासून सहा वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे परीक्षा झाली नव्हती. त्यानंतर २१ नोव्हेंबरला दोन सत्रांत परीक्षा झाली. गैरप्रकार रोखण्यासाठी कार्बनलेस उतरपत्रिका वापरण्यात आल्या होत्या. मात्र, आता या परीक्षेत खुद्द आयुक्तांनीच घोळ निर्माण केल्याने आमचे काय? हा प्रश्न आहे.

आमचा काय दोष?

काेरोनामुळे टीईटी परीक्षा झाली नव्हती. आता ही परीक्षा दिली असून पेपरफुटी प्रकरणात जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई होईलच, पण यात आमचा काय दोष, आता आमचं काय, त्यावर तोडगा काढून शासनाने आम्हाला दिलासा द्यावा.

शीतल देशमुख, विद्यार्थिनी.

पेपर फुटला हे आम्हाला माहिती नाही. आम्ही अभ्यास करून परीक्षा दिली. अपात्र उमेदवारांच्या निकालात फेरफार करून पात्र ठरवले असेल, तर मेहनतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. असे ८०० उमेदवार अपात्र असल्याचे ‘लोकमत’च्या १९ डिसेंबरच्या वृत्तपत्रात वाचले. त्यांचा निकाल बदलला त्यावर कारवाई करावी, आमची चूक नसून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

सुनीता बोबडे.

२०२० मध्ये १६५९२ विद्यार्थी पात्र ठरले. उर्वरित विद्यार्थी व नवीन विद्यार्थी पुन्हा २०२१ च्या परीक्षेला बसले. मात्र, आता शिक्षकांच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याने अनेक प्रश्न फुटले. आमच्या सारखेच गरीब विद्यार्थ्यांचे नशीबच फुटले. शिक्षक होण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार का? असा प्रश्न पडला आहे.

चंदा हरिभाऊ पवार.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीexamपरीक्षा