शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पावसाअभावी धान उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:12 IST

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मागील वीस दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस झाला नाही. परिणामी धानाच्या बांध्यामध्ये भेगा पडल्या आहेत. काही शेतकºयांची पावसाअभावी रोवणी खोळंबली आहेत. मागील वर्षी सुध्दा दुष्काळ पडला होता. त्यानंतर यावर्षीही तशीच स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी रोवणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने धान पिक धोक्यात आले आहे. तिरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. मात्र पावसाअभावी शेतात भेगा पडल्या असून धान वाळत चालल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळते, त्यांच्यावर सुध्दा संकट ओढावले आहे. शेतातील धान पिक पिवळे पडत आहे. परिसरातील ८० ते ८५ टक्के रोवणी झालेली असून १५ ते २० टक्के रोवणी शिल्लक आहेत. ढगाळ वातावरणामुळे धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव सुध्दा वाढण्याची शक्यता आहे. विजेचा पुरवठा अनियमित होत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. यावर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती