शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पावसाअभावी धान उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:12 IST

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मागील वीस दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस झाला नाही. परिणामी धानाच्या बांध्यामध्ये भेगा पडल्या आहेत. काही शेतकºयांची पावसाअभावी रोवणी खोळंबली आहेत. मागील वर्षी सुध्दा दुष्काळ पडला होता. त्यानंतर यावर्षीही तशीच स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी रोवणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने धान पिक धोक्यात आले आहे. तिरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. मात्र पावसाअभावी शेतात भेगा पडल्या असून धान वाळत चालल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळते, त्यांच्यावर सुध्दा संकट ओढावले आहे. शेतातील धान पिक पिवळे पडत आहे. परिसरातील ८० ते ८५ टक्के रोवणी झालेली असून १५ ते २० टक्के रोवणी शिल्लक आहेत. ढगाळ वातावरणामुळे धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव सुध्दा वाढण्याची शक्यता आहे. विजेचा पुरवठा अनियमित होत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. यावर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती