शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

जेष्ठ नागरिकांचा विषय ग्रामसभेत घेण्याची सक्ती

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.

मिळणार दिलासा : सरपंच-ग्रामसेवकांना निर्णयाची जाणीवच नाहीैहुपराज जमईवार - परसवाडामहाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडली जावी हा उद्देश आहे. परंतु अनेक सरपंच आणि ग्रामसेवकांना या निर्णयाची जाणीवच नसल्याची माहिती पुढे आली आहे.जात, वंश, लिंग, शिक्षण, आर्थिक दर्जा अशा कोणत्याही बाबीचा विचार जेष्ठ नागरिकांचा दर्जा देताना विचारात घेतला गेलेला नाही. जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्यांचे गावपातळीवर निराकरण होण्यासाठी जेष्ठ नागरिकांचा विषय ग्रामसभेत सुचीवर घेण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींला परिपत्रक, सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. शासन परिपत्रकात जेष्ठ नागरिकांना घरघुती हिंसाचारापासून जेष्ठ नागरिकांचे संरक्षण केले जावे, जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारे संघ, बिगर सरकारी संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा, आवश्यक सूचना अथवा सुरक्षाविषयक मदत मिळावी. जाणीव, जागृती घेऊन जेष्ठ नागरिकांप्रती सहानुभूती वाढावी म्हणून जेष्ठ नागरिकांचा विषय वर्षातील ४ पैकी किमान दोन ग्रामसभेत ठेवण्यात यावा व जेष्ठ नागरिकांच्या कल्याणाची ग्रामसभेत चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात यावे असे परिपत्रकात नमुद आहे. तसेच वृध्द नागरिकांसाठी समुपदेशक केंद्र बनवणे, त्याच्या आरोग्याची नियमित चाचणी/तपासणी देखभाल करणे, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील ताणतणावाला जेष्ठ नागरिकांना सक्षमपणे तोंद देता यावे, गृहनिर्माण योजनांमध्ये जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करून देणे, जेष्ठ नागरिकांचा चरितार्थ चालविण्यासाठी अधिनियम २००७ तसेच त्यांच्याअंतर्गत २३ जून २०१० च्या अधिसुचनेनुसार राज्यात लागू झालेल्या नियतम २०१० मधील तरतुदीची अंमलबजावणी करून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून खर्च देण्याची तरतुद केली आहे. जेष्ठ नागरिक एकाकी राहात असतील अशा जेष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी ग्रामसभेत ठेवण्यात यावी, ती जाहीर करावी, जेष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीकडे माहिती अद्ययावत ठेवावी, घरगुती हिंसाचारापासून कलह, तंटे यापासून जेष्ठ नागरिकांचे सरंक्षण केले जाते याची माहिती देणे, आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा, सुरक्षाविषयक मदत देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. सर्व ग्राम पंचायतीनी याबाबतचा आढावा पंचायत समितीच्या मासिक सभेत सुध्दा घेण्यात यावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणीच सुरू झालेली नाही. त्यामुळे याबाबतही माहितीसुद्धा कोणाला नसल्याचे परिसरात दिसून येत आहे.