शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जेष्ठ नागरिकांचा विषय ग्रामसभेत घेण्याची सक्ती

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.

मिळणार दिलासा : सरपंच-ग्रामसेवकांना निर्णयाची जाणीवच नाहीैहुपराज जमईवार - परसवाडामहाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडली जावी हा उद्देश आहे. परंतु अनेक सरपंच आणि ग्रामसेवकांना या निर्णयाची जाणीवच नसल्याची माहिती पुढे आली आहे.जात, वंश, लिंग, शिक्षण, आर्थिक दर्जा अशा कोणत्याही बाबीचा विचार जेष्ठ नागरिकांचा दर्जा देताना विचारात घेतला गेलेला नाही. जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्यांचे गावपातळीवर निराकरण होण्यासाठी जेष्ठ नागरिकांचा विषय ग्रामसभेत सुचीवर घेण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींला परिपत्रक, सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. शासन परिपत्रकात जेष्ठ नागरिकांना घरघुती हिंसाचारापासून जेष्ठ नागरिकांचे संरक्षण केले जावे, जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारे संघ, बिगर सरकारी संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा, आवश्यक सूचना अथवा सुरक्षाविषयक मदत मिळावी. जाणीव, जागृती घेऊन जेष्ठ नागरिकांप्रती सहानुभूती वाढावी म्हणून जेष्ठ नागरिकांचा विषय वर्षातील ४ पैकी किमान दोन ग्रामसभेत ठेवण्यात यावा व जेष्ठ नागरिकांच्या कल्याणाची ग्रामसभेत चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात यावे असे परिपत्रकात नमुद आहे. तसेच वृध्द नागरिकांसाठी समुपदेशक केंद्र बनवणे, त्याच्या आरोग्याची नियमित चाचणी/तपासणी देखभाल करणे, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील ताणतणावाला जेष्ठ नागरिकांना सक्षमपणे तोंद देता यावे, गृहनिर्माण योजनांमध्ये जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करून देणे, जेष्ठ नागरिकांचा चरितार्थ चालविण्यासाठी अधिनियम २००७ तसेच त्यांच्याअंतर्गत २३ जून २०१० च्या अधिसुचनेनुसार राज्यात लागू झालेल्या नियतम २०१० मधील तरतुदीची अंमलबजावणी करून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून खर्च देण्याची तरतुद केली आहे. जेष्ठ नागरिक एकाकी राहात असतील अशा जेष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी ग्रामसभेत ठेवण्यात यावी, ती जाहीर करावी, जेष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीकडे माहिती अद्ययावत ठेवावी, घरगुती हिंसाचारापासून कलह, तंटे यापासून जेष्ठ नागरिकांचे सरंक्षण केले जाते याची माहिती देणे, आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा, सुरक्षाविषयक मदत देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. सर्व ग्राम पंचायतीनी याबाबतचा आढावा पंचायत समितीच्या मासिक सभेत सुध्दा घेण्यात यावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणीच सुरू झालेली नाही. त्यामुळे याबाबतही माहितीसुद्धा कोणाला नसल्याचे परिसरात दिसून येत आहे.